स्वामी सदा ला नख कापायला सांगतात. स्वामी :"सदा तू काय म्हणालास आई आजारी आहे जा तिला घेऊन ये " सदा :"अहो पण ती अंथरुणावरून उठूच शकत ती कशी येईल " स्वामी :"मग आमचा अंश घेऊन जा " भुजंग सांगतात कि स्वामींच्या नखाचा ताबीज करून आईच्या गळ्यात घाल . सदा हो म्हणून नख सांभाळून ठेवतो. स्वामी तिथून कुठेतरी जातात आणि सगळ्यांना तिथेच थांबायला सांगतात. एक आजारी व्यक्ती स्वामींना शोधत येतो, आणि स्वामींना शोधत जातो.
दुसरीकडे देवयानी बाईसाहेब त्यांच्या सासू ना सांगतात त्या आई होणार नाहीत आणि आजारी आहेत . सासू चिडून देवयानी बाईसाहेबाना , रागावतात कि त्यांनी त्यांच्या मुलाच्या आयुष्याची वाट लावून ठेवली . चंदा देवयानी बाईसाहेबांसाठी खंडोबा कडे साकडं घालायला जाते . चंदा ला स्वामी भेटतात :ती फुलं स्वामींना वाहते आणि नमस्कार करते . चंदा :"स्वामी मला ठाऊक आहे ,खंडोबा आणि तुमच्यामध्ये काही फरक नाही .देवयानी बाईसाहेबाना कळेल तेव्हा कळेल ,पण मला कळलंय , स्वामी देवयानी बाईसाहेबांचे आजार बरं व्ह्याला पाहिजे " स्वामी :"विधी लिखितावर पूजेचा उपयोग होत नाही ,शिव शंकर शंभो "
दुसरीकडे तो आजारी व्यक्ती स्वामींना शोधत आचार्यांची घरी येतो . ती आचार्यांची बायको गया वाहिनी त्यांना पाणी आणून देते . ती आजारी व्यक्ती सांगते, माझा पोट खूप दुःखत असता , स्वतः दत्त गुरु नि स्वप्न दृष्टांत दिला "श्रीपुरी चे झाड चे रस पी ,पण ते झाड कुठेच भेटला नाही ":"अक्कलकोटच्या स्वामीच हे कोड सोडवतील" . ती व्यक्ती स्वामींकडे येते .स्वामी :"श्रीदहरा फार त्रास सोसलंस तू पण आता संपणार, त्या वटवृक्षापासून इतपर्यंत फेऱ्या मारला ना तो तुझ्या भोगांचा होता आणि आता तो पूर्ण होणार हे झाड दिसत या लिंबाच्या झाडाला श्रीपुरी चे झाड म्हणतात " ती व्यक्ती "स्वामी तुम्ही प्रत्यक्ष देव आहात " तिथे चोळप्पा येतात .स्वामी त्यांना या झाडाच्या पाला चा रस काढायला सांगतात. चोळप्पा रस काढायला जातात .
दुसरीकडे फुटाण्या राधा ला समजावतो स्वामींच्या नदी लागायला नको .पण राधा त्याचा ना ऐकता :"त्या बुवाला नमवणं जरा कठीण आहे पण मी ते करणारच "
No comments:
Post a Comment