1. राधा जिजा च्या शेजारी बसलेली असते .फुटाण्या :"होय ग राधे कोणी आणला असेल ग पाला " जिजा झोपेत :"देव बाप्पा , तू मला भेटायला ये ,तू नाही आला तर ते मला मारतील " राधा आणि फुटाण्या चिंता करत तिथून बाहेर येतात . राधा :"अरे कुठून आणायचा रे देव बाप्पा " तेव्हा तिथे स्वामी येतात .:"शिव शंकर शंभो "
फुटाण्या :"हा आणिक कशाला आला आता इथं . स्वामी आणि राधा त्यांना अडवू लगतात .स्वामी :"आगा वेडे तू कोणाला अडवतेस त्याची कलपना आहे का तुला " स्वामी जिजा कडे जातात . तिला प्रेमाने कुरवाळू लागतात .जिजा उठून खुश होऊन :"देव बाप्पा तू आलास " स्वामी :"आम्ही जाणीवपूर्वक पुढून आलोत कारण तुला कळावा कि तूझ्या जिजाचा देव बाप्पा कोण आहे ते " राधा चिडून :"मुद्दामून केलास ना तू हे सगळं ,गावाच्या लोकांना मी माझ्या बाजूनं करून घेतलेस म्हणून तू माझ्या बहिणाला फितावलास ,अरे हिम्मत होती तर समोरून लढ्याचं ना " स्वामी :"अजून हि तितकाच विचार करतेस ",हरकत नाही योग्य वेळ आई कि तुझ्हा विचार शुद्ध होतीलच " राधा :"आला मोठा शुद्ध करणारा हि राधा आधीपासून शुद्ध आहे "
2. दुसरीकडे चंदा , राणी सरकारसाठी वैद्याकडून औषध आणलेला असतं .पण तिथे दाजीबा सरकार बसलेले असल्यामुळें घाबरते .दाजीबा सरकार विचारतात पिशवीत काय आहे चंदा घाबरून पिशवी दाखवते .त्यात खरंच औषध च्या ऎवजयी फुलं असतात . स्वामी :"चांदुले बाळा नेहमी तू आम्हाला फुलं देतेस आज आम्ही तुला फुल दिलेत " दुसरीकडे चंदा देवयानी बाईसाहेबाना औषदाबद्दल सांगणार असते पण तिथे दाजीबा येऊन सांगतात :"राणी सरकार आम्हाला तुमच्याकडे कबुली द्यायची आहे " राणी :"कसली कबुली " दाजीबा :"अम्ही तुला जे औषध येतो ,म्हणजे नदी काठी एक माणूस राहतो, तो जाणकार आहे जडीबुटीतला ,आम्हाला हि त्याचा औषदाचा बराच अनुभव आहे " राणी :"मग त्यात कसली कबुली " दाजीबा :"उद्या कोणी तिसऱ्या माणसाने हे सांगितलं आणि तुमचा गैरसमज झाला तर " राणी :"अहो सरकार आम्हाला तुमच्यावर कधीच गैरसमज होणार नाही ,आणि तुम्हाला माहित नाही ना जितका आमचा स्वतःवर विश्वास नाही त्याच्या पेक्षा कितीतरी पटीने तुमच्यावर विश्वास आहे " दाजीबा सरकार खुश होऊन राणी सरकार ला जवळ घेतात. आणि चंदा कडे पाहून विचार करतात :"चन्दे आम्ही तुझ्यापेक्षा दोन पावले पुढे आहोत बरं का ,आता तुझा संशय आता दूर झाला असेल कायमचा " पण चंदा घाबरलेली असते .
3. दुसरीकडे जिजा राधाला एक मुक्का देऊन :"तू आज चांगला काम केलेस देव बाप्पा ला बोलवून ,तो खूप चांगला आहे " राधा मनात विचार करते :"जिजा ला मी त्या बुवाला भेटू द्याची नाही " राधा तिला गोष्ट सांगून झोपावंते .
दुसरीकडे एक व्यक्ती स्वामींना :"स्वामी केवळ मनाच्या बळावर तीर्थयात्रा करतोय ,कर्जबाजारी झालोय ,मला कर्जमुक्त करा " स्वामी :"अरे आम्ही ठरलो संन्यासी माणूस, तुला जर आमच्याकडून काही हवा असेल तर ती माती उचल आणि जा घरी " तो व्यक्ती माती ना उचलता तसाच थांबतो :चोळप्पा "स्वामी आज्ञेचा पालन करा " व्यक्ती :"माती घेऊन काय करू " स्वामी चिडून :"नको असेल तर चालत हो " चोळप्पा:" अहो ऐका ,स्वामी आज्ञेचा अवमान करू नका " त्यावर टोमाणूस मातीचा एक ढेकुळं घेऊन तिथून निघून जातो . स्वामी खुश होऊन :"शिव शंकर शंभो. "
No comments:
Post a Comment