Avoid Copy Paste

Tuesday, 31 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 212.0 "स्वामींच्या इशाऱ्या शिवाय काहीच होत नाही इथे"

   S1 E212.0 29th Aug shree swami samarth Swami bhaktano namaskar श्री स्वामी समर्थ भाग 210.0 "स्वामींच्या  इशाऱ्या शिवाय काहीच होत नाही इथे"  



स्वामी सगळ्या भक्तांना  :"हि पृथ्वी आम्ही आमच्या बोटावर तोलून धरतो, आमच्या इशाऱ्या शिवाय काहीच होत नाही इथे,मग त्यात सगळेच आले ,पशु पक्षी प्राणी माणसं   " तिथे आचार्य येतात :"हो ,मग त्या झाडांवर बसलेल्या चिमणी ला सांगा ,तिने उडायचा नाही ,तुम्ही सांगे पर्येंत तिथून हलायचा हि नाही " आता स्वामी काय उत्तर देतील पाहू या आजच्या भागात . 

श्री स्वामी समर्थ भाग 210 "स्वामींनी दिले श्री कृष्ण रूपात दर्शन "

 


 S1 E210 30th Aug shree swami samarth Swami bhaktano namaskar श्री स्वामी समर्थ भाग 210 "स्वामींनी दिले श्री कृष्ण रूपात दर्शन "  



स्वामी जीजा ला :"पोरी छान आज तू बहीणी ची लाज राखलीस " फुटाण्या राधा ला :"राधे ह्या बुवा कडे नक्की मोठीच शक्ती आहे बघ ,म्हणून नंतर मनाचा बी ऐकतॊय तो " राधा बाई :"गप उभार इथे " स्वामी :"फुटाण्या अरे तुझी भावना आमच्याकडे पोहचली बर , अरे सच्ची भावना आमच्याकडे आपोआप पोहचते ,शिव हरी शंकर नमामि शंकर शंभो "


स्वामी चोळप्पांच्या घरी गेल्यावर: "हा विडा राधा आक्कांनी बनवलं आहे वाटतं " राधा अक्का :"तर तर सगळं नेमका कळत ह्याला ,तसं काही नाही हो जावायचा भार हलक केलं एवढच " स्वामी :"चोळ्या आम्हाला आता बासरी हवीय " सकाळी स्वामी दूध पित नाहीत" नाही नको जोपर्यंत चोळ्या आम्हाला बासरी देत नाही तोपर्यंत काही नको.  "   चोळप्पा जाऊन बासरी घेऊन येतात . स्वामी :"वाह चोळ्या  , जा बस आता अराम कर आता ,लगेच येऊ नको आमच्यामागे "


दुसरीकडे राधा आणि  फुटाण्याला बासरीचा आवाज येतो . ते शोधात जातात आवाज मागे . एक आंधळा साधू बासरी वाजवत असतो .साधू :"कोण?" राधा बाई :

"बाबा कोण तुम्ही ,तुमचा नाव काय ,कुठल्या गावचे ,बासुरी कुठे शिकलात ,छान  वाजवता " बाबा :"मी सूरदास , मी जन्मतः आंधळा आहे , परमेश्वराने मला हि कला आनंद मिळावी म्हणून दिली असावी बहुतेक , भगवान श्री कृष्ण च्या हातात हि बासरी असते असा ऐकलंय ,"खरंतर कृष्ण कसा दिसतो मला माहित हि नाही ,याची देही याच डोळी दर्शन घ्याचा आहे "

राधा बाई विचार करते स्वामींची फजिती करावी . म्हणून ती :"बाबा,ह्या गावात एक सिद्ध पुरुष राहतात ,तुमची श्री कृष्णा दर्शनाची इच्छा नक्की पूर्ण करतील, स्वामी लै पोचलेले सिद्ध पुरुष आहेत, अशक्य हि शक्य करतात अशी ख्याती आहे त्यांची "

दोघेजण सूरदास बाबाना स्वामींकडे घेऊन येतात .  स्वामी ध्यानात बसलेत .. सगळेजण वाट बघत बसतात . 


दुसरीकडे दाजीबा देवयानी बाईसाहेबानची काळजी घेत असतात .देवयानी :"सरकार आम्ही आजारपण आईसाहेबांना जाणवू देणार नाही " . दाजीबा मनात विचार करतात "राणी साहेब हे सगळं कारण भाग आहे हो आम्हाला नाहीतर नसतं इतका त्रास दिला , हे सगळं तुझ्यासाठी चालू आहे चंदा आणि तुला त्याची खबरच नाही "  तिथे सुमुख येतो  आणि दाजिबांना  महाराजांकडे घेऊन जातो  . देवयानी बाईसाहेब आई साहेबाकडे घेऊन चल म्हणून चंदा ला  त्यांच्या  सासू कडे घेवून जातात .  सासू त्यांना पाय चेपायला सांगतात . सासू त्यांना लाथ मारतात . "हे असा असता पाय चेपण ,इतका हलका " सासू त्यांना परत पाय चेपायला लावतात. चंदा  मनात विचार करते  :"स्वामी मला हे बघवेना झालाय आता तुम्हीच काहीतरी करा "

दुसरीकडे सूरदास बाबा ,राधा फुटाण्या आणि सगळे गावकरी स्वामींची वाट बघत बसतात. पण स्वामी ध्यानांत च बसलेत .  


Sunday, 29 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 210.0 "स्वामींनी दिले श्री कृष्ण रूपात दर्शन "

  S1 E210.0 29th Aug shree swami samarth Swami bhaktano namaskar श्री स्वामी समर्थ भाग 210.0 "स्वामींनी दिले श्री कृष्ण रूपात दर्शन "  



एक अंध साधू :"खरंतर कृष्ण कसा दिसतो मला माहित हि नाही ,याची देही याच डोळी दर्शन घ्याचा आहे " राधा बाई आणि फुटाण्या त्या साधू ला स्वामींकडे घेऊन येतात . तिथे येऊन ते साधू खूप प्रकाश आल्यामुळे डोळे बंद करतात . पण डोळे उघडल्यावर त्यांना स्वामी  , मुरली वाजवतांना  भगवान  श्री कृष्ण रूपात दर्शन देतात . स्वामींनी कृष्ण भक्त सूरदास ह्यांना श्री कृष्णा रूपात दर्शन दिले होते तसेच ,त्यांचे सगळे दुःख दूर होऊन त्यांना भरपूर ज्ञान मिळेल असा आशीर्वाद दिला होता . 

हे साधू सूरदास च आहेत का ? हा पूर्ण भाग पाहण्यासाठी चॅनेल ला सब्स्क्रिब करा . धन्यवाद . 


Saturday, 28 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 209.0 "आमचे पाय धु "

   S1 E209.0 28th Aug shree swami samarth Swami bhaktano namaskar श्री स्वामी समर्थ भाग 209.0 "आमचे पाय धु "  



स्वामी चिडून गावातून चालत असतात .चोळप्पा आणि नारसप्पा त्यांच्या मागे मागे धावत असतात . स्वामी चिखलातून चालत जातात आणि झाडाखाली येऊन बसतात .तेथे राधा बाई येते :"स्वामी मला फकस्त एक संधी द्या तुमची सेवा करायचे " स्वामी:"मग पाय धु आमचे " स्वामींचे पायाला चिखल लागले आहे . राधा बाई गोंधळून जातात . 

भक्तांनो देव नेहमीच आपली परीक्षा घेत असतो . भक्ती मध्ये अहंकार ला मुळीच जागा नाही . अर्जुनाला पण जेव्हा अहंकार झाला होता तेव्हा भगवान श्री कृष्ण नि त्याचा अहंकार मोडला होता . आता राधा बाईची सुद्धा  परीक्षा होता आहे .राधा बाईला आपल्या सौन्दर्याचा खूप अहंकार आहे . सूड बुद्धी सोडून राधा बाई स्वामी शरण जाईल का?. हा पूर्ण भाग पाहण्यासाठी चॅनेल ला सुब्स्क्रिब करा . धन्यवाद .  


श्री स्वामी समर्थ भाग 209.0 "श्रीपुरीचे झाडं "



स्वामी सदा ला नख कापायला सांगतात. स्वामी :"सदा तू काय म्हणालास आई आजारी आहे जा तिला घेऊन ये " सदा :"अहो पण ती अंथरुणावरून उठूच शकत ती कशी येईल " स्वामी :"मग आमचा अंश घेऊन जा " भुजंग सांगतात कि स्वामींच्या नखाचा ताबीज करून आईच्या गळ्यात घाल . सदा हो म्हणून नख सांभाळून ठेवतो. स्वामी तिथून कुठेतरी जातात आणि सगळ्यांना तिथेच थांबायला सांगतात. एक आजारी व्यक्ती स्वामींना शोधत येतो, आणि स्वामींना शोधत जातो.

दुसरीकडे देवयानी बाईसाहेब त्यांच्या सासू ना सांगतात त्या आई होणार नाहीत आणि आजारी आहेत . सासू चिडून देवयानी बाईसाहेबाना , रागावतात कि त्यांनी त्यांच्या मुलाच्या आयुष्याची वाट लावून ठेवली . चंदा देवयानी बाईसाहेबांसाठी खंडोबा कडे साकडं घालायला जाते .  चंदा ला स्वामी भेटतात :ती फुलं  स्वामींना वाहते आणि नमस्कार करते  . चंदा :"स्वामी मला ठाऊक आहे ,खंडोबा आणि तुमच्यामध्ये काही फरक नाही .देवयानी बाईसाहेबाना कळेल तेव्हा कळेल ,पण मला कळलंय  , स्वामी देवयानी बाईसाहेबांचे आजार बरं व्ह्याला पाहिजे  "  स्वामी :"विधी लिखितावर पूजेचा उपयोग होत नाही ,शिव शंकर शंभो "


दुसरीकडे तो आजारी व्यक्ती स्वामींना शोधत आचार्यांची घरी येतो . ती आचार्यांची बायको गया वाहिनी त्यांना पाणी आणून देते . ती आजारी व्यक्ती सांगते, माझा पोट खूप दुःखत असता ,  स्वतः दत्त गुरु नि स्वप्न दृष्टांत दिला "श्रीपुरी चे झाड चे रस पी ,पण ते झाड कुठेच भेटला नाही ":"अक्कलकोटच्या स्वामीच हे कोड सोडवतील" . ती व्यक्ती स्वामींकडे येते .स्वामी :"श्रीदहरा फार त्रास सोसलंस तू पण आता संपणार, त्या वटवृक्षापासून इतपर्यंत फेऱ्या मारला ना तो तुझ्या भोगांचा होता आणि आता तो पूर्ण होणार हे झाड दिसत या लिंबाच्या झाडाला श्रीपुरी चे झाड म्हणतात " ती व्यक्ती "स्वामी तुम्ही प्रत्यक्ष देव आहात "  तिथे चोळप्पा येतात .स्वामी त्यांना या  झाडाच्या पाला चा रस काढायला सांगतात. चोळप्पा रस काढायला जातात .  

दुसरीकडे फुटाण्या राधा ला समजावतो स्वामींच्या नदी लागायला नको .पण राधा त्याचा ना ऐकता :"त्या बुवाला नमवणं जरा कठीण आहे पण मी ते करणारच "

श्री स्वामी समर्थ भाग 209.0 "स्वामींची लीला"


 

स्वामी सदा ला नख कापायला सांगतात. स्वामी :"सदा तू काय म्हणालास आई आजारी आहे जा तिला घेऊन ये " सदा :"अहो पण ती अंथरुणावरून उठूच शकत ती कशी येईल " स्वामी :"मग आमचा अंश घेऊन जा " भुजंग सांगतात कि स्वामींच्या नखाचा ताबीज करून आईच्या गळ्यात घाल . सदा हो म्हणून नख सांभाळून ठेवतो. स्वामी तिथून कुठेतरी जातात आणि सगळ्यांना तिथेच थांबायला सांगतात. एक आजारी व्यक्ती स्वामींना शोधत येतो, आणि स्वामींना शोधत जातो.

 

दुसरीकडे देवयानी बाईसाहेब त्यांच्या सासू ना सांगतात त्या आई होणार नाहीत आणि आजारी आहेत . सासू चिडून देवयानी बाईसाहेबाना , रागावतात कि त्यांनी त्यांच्या मुलाच्या आयुष्याची वाट लावून ठेवली . चंदा देवयानी बाईसाहेबांसाठी खंडोबा कडे साकडं घालायला जाते .  चंदा ला स्वामी भेटतात :ती फुलं  स्वामींना वाहते आणि नमस्कार करते  . चंदा :"स्वामी मला ठाऊक आहे ,खंडोबा आणि तुमच्यामध्ये काही फरक नाही .देवयानी बाईसाहेबाना कळेल तेव्हा कळेल ,पण मला कळलंय  , स्वामी देवयानी बाईसाहेबांचे आजार बरं व्ह्याला पाहिजे  "  स्वामी :"विधी लिखितावर पूजेचा उपयोग होत नाही ,शिव शंकर शंभो "


दुसरीकडे तो आजारी व्यक्ती स्वामींना शोधत आचार्यांची घरी येतो . ती आचार्यांची बायको गया वाहिनी त्यांना पाणी आणून देते . ती आजारी व्यक्ती सांगते, माझा पोट खूप दुःखत असता ,  स्वतः दत्त गुरु नि स्वप्न दृष्टांत दिला "श्रीपुरी चे झाड चे रस पी ,पण ते झाड कुठेच भेटला नाही ":"अक्कलकोटच्या स्वामीच हे कोड सोडवतील" . ती व्यक्ती स्वामींकडे येते .स्वामी :"श्रीदहरा फार त्रास सोसलंस तू पण आता संपणार, त्या वटवृक्षापासून इतपर्यंत फेऱ्या मारला ना तो तुझ्या भोगांचा होता आणि आता तो पूर्ण होणार हे झाड दिसत या लिंबाच्या झाडाला श्रीपुरी चे झाड म्हणतात " ती व्यक्ती "स्वामी तुम्ही प्रत्यक्ष देव आहात "  तिथे चोळप्पा येतात .स्वामी त्यांना या  झाडाच्या पाला चा रस काढायला सांगतात. चोळप्पा रस काढायला जातात .  

दुसरीकडे फुटाण्या राधा ला समजावतो स्वामींच्या नदी लागायला नको .पण राधा त्याचा ना ऐकता :"त्या बुवाला नमवणं जरा कठीण आहे पण मी ते करणारच "

Thursday, 26 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 207.0 "राधा बाई घेणार बदला"


 

स्वामी चोळप्पाना :"चोळ्या जा घरी जा, आज आम्हाला राधा कढ जायचं आहे "

दुसरीकडे राधा बाई जिजा ला झोपवत असते:"चल झोपून घे ,लई उशीर झालंय " .जिजा :"माझ्या लक्षात आहे आज देव बाप्पा येणार आहे " राधा बाई मनात विचार करते :"कसा सांगू तुला आज त्या बुवाला फक्त मी भेटणार आणि त्याचा कायमचा बंदोबस्त करणार " जिजा झोपी जाते . राधा बाई :"आज येऊ दे बुवा ला , आज वरच्या सगळ्या अपमानाचा बदल घेणार आहे मी " स्वामी हे सगळं बघून चिडतात 

Wednesday, 25 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 206 "स्वामींनी भीमा ला केले बरे "



 1. स्वामी चंदा,जिजा,चोळप्पा आणि येशू ना मूठभर चण्याची गोष्ट सांगत असतात. राधा अक्का सगळ्यांना दूध देतात आणि गोष्ट पूर्ण करतात. चंदा जिजा ला :"जिजा तुझ्या हाताला काय बांधलंय " जिजा ला राधा बाईंनी सांगितलेलं आठवते. जिजा :"देव बप्पा उद्या रात्री तू आमच्या घरी येणार ना " स्वामी:"आगा बाळा तुझं मन कसा काय दुखवू आम्ही ,आम्ही येणार तुझ्या घरी येणार तुला भेटायला येणार "

2. दुसरीकडे भीमा स्वामींना सांगतात "स्वामी मला लग्नासाठी स्थळ चालून आलाय, नाऱ्याना त्या पोरीला आणि त्याच्या आईला इथंच बोलावलंय बघा.स्वामी माझा लग्न होणार ना ? " स्वामी मात्र शांत बसलेत .  

आई मुलीला घेऊन येतात  :"ए नाऱ्या ,माझी मुलगी काय वाऱ्यावर पडलीय ,या भीमाला आवळू आहे ,ह्याच्याशी माझ्या मुलीचा लग्न लावणार होतास ?" नाऱ्या :"आगा जरा हळू बोल कि मी सांगितलं होता कीं" आई :"अरे खोटारड्या ,हे लग्न होणार नाही , हि सोयरीक मोडली " आचार्य तिथे येतात आणि हसू लागतात . आई :"या अक्कलकोटात  परत पाऊल  ठेवणार नाही ,सगळी खोटारडी लोक राहतात इथे " स्वामी चिडून खाली बसतात आणि त्या दोन रंगवलेल्या मडक्यावर हात ठेवतात. मुलगी म्हणते :"आगा आई , ऐक ना जरा ,आगा काय बिघडला असता " आई :"तुला आता वाटतंय पोरी ,पुढं सगळं आयुष्य काढायचा आहे ,तुझा परत एकदा लग्न मोडला ,आपल्या गरिबी मूळ चांगली स्थळं येत नाहीत आणि आली  तर हा अशी येतात .तुझ कसा होणार पुढं कोणास ठाऊक"आईला चक्कर येत  असते . भीमा त्यांना पाणी आणतो .मुलगी आईला पाणी पाजते :"आई तुला बारा वाटत आहे ना " भीमा:"त्यांना काय होतंय " मुलगी :"त्यांना रक्तदाबाचा त्रास आहे आणि ते माझ्या मुळेच आहे , माझा लग्न जुळत नाही म्हणून त्याची सतत चिंता करत असते, तुमच्या 


स्थळा  कडून त्यांना खूप अपेक्षा होतीं ,इथे जमेलच असा वाटलं होता ,पण हे असा झाल्यानं तिला सहनच झाला नाही " भीमा :"अहो पण हे असा झाल्यानं त्यांच्या  जीवावर बेतेल कि " आई :"आगा ह्यांच्या सोबत बोलत काय बसलीस ,कसं  तरी होतंय "  भीमा :"आई तुम्ही काय भी काळजी करू नका , अहो अक्कलकोटचे हवा लै शुद्ध आहे ,सगळं व्यवस्थित होईल ,तुम्हाला बारा बी वाटेल " भीमा खाली बसून त्या मुलींच्या  आईचे पाय चोळू लागतो :"आई, तुम्हाला पोरीचा लग्न माझ्याशी नाही ना करायची ,नका करू ,तुम्हाला खरा सांगू का , बारा झाला हे लग्न मोडला ,अहो माझ्या पेक्षा चांगला मुलगा तिच्या नशिबात असेल  ,म्हणून हे लग्न मोडला असा समजा ,अहो एवढा नक्षत्रासारखी मुलगी तुमची ,म्या स्वतः खटपट करेन ,असा पोरगा बघेन जो फक्त नारळ घेऊन तुमच्या पोरींशी  लग्न करेल पण तुम्ही काळजी करू नका ""आई आता बारा वाटतंय ना तुम्हाला ,म्हणजे शांत वाटतंय ना तुम्हाला " आई :"होय आता बारा वाटतंय  शरीर आणि बुद्धी  ठिकाणावर आहे " आई उठतात . भीमा :"आई ,तुम्ही काळजी करू नका ,म्या बैलगाडीची लगेच व्यवस्था करतो त्यात बसून जावा " आई :"त्याची काही गरज नाही ,म्या एक विचारू का?" भीमा :"विचारा ना " आई :"तुम्हाला कोणती वेळ सोईस्कर आहे ते सांगा म्हणजे तुमच्या लग्नाचा मुहूर्त काढू या " सगळेजण खुश होतात. भीमा :"म्हणजे आमचा लग्न " आई :"हो ना , अहो तुमच्यासारखा चांगला आणि मोठ्या मनाचा मुलगा आम्हाला कुठं मिळणार आहे ,मी तुम्हच्या बद्दल इतका वाईट बोलले ,नावं ठेवली ,लग्न मोडून निघाले होते पण तुम्ही आमचं चांगलाच विचार केला ,तरीपण तुम्ही माझी इतकी चांगली काळजी घेतली ,मला सांगा कुठून मिळणार तुमच्यासारखा चांगला मुलगा ,तुम्हीच माझ्या मुलीला सुखात ठेवाल  " भीमा :"आई ,हा तुमच्या मनाचा मोठेपणा ,पण तुमच्या मुलीला विचारा ना म्या त्यांना पसंद आहे का म्हणून "  आई :"काय ग पसंद आहे ना " मुलगी हो म्हणते .आचार्य :"म्हातारे ,आगा मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ,आगा तिला आयुष्यभर  भोगावा लागेल या भीम्या मूळ " स्वामी चिडून :"काय रे दुसऱ्याचा भलं बघवत नाही ना तुला " आचार्य:"या मुलीच्या आयुष्यात काय भलं होणार आहे,  ह्याच्याशी लग्न केला ना आयुष्यभर सोसावा लागणार आहे तिला " स्वामी :"अरे काय सोसायचा ते ती सोसेल ना ,तुला काय अडचण आहे,चाल  " 

भीमा :"स्वामी पाय पडतो " स्वामी :"ते पाय बाय नंतर जा दगड घेऊन ये  " भीमा स्वामींना  दगड आणून  देतात. स्वामी :"हुंडासा काढ ,काढ म्हटलं ना  " भीमा डोक्यावरचा हुंडासा म्हणजे पगडी काढतात . स्वामी :"भीमा ,आमची लेक आहे ती , आमच्या लेकीचा लग्न  करतोय ,आणि आम्हाला हा असा दोन डोक्याचा जावई नकोय ,एकच डोकं हवा आणि ते हि ताळ्यावर हवा ,काय " असे म्हणून स्वामी त्या दोन मडक्यातील एक छोटा मडकं  उचलतात :"शिव हरी शंकर ,नमामि शंकर ,शिव शंकर शंभो " 

Tuesday, 24 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 205 "ताठ मनानं आणि ताठ कंण्यानं जगायला शीक"



1. स्वामी त्यांनी रंगवलेलं मडकं जमिनीत पुरतात. त्यावर एक छोटा मडकं  ठेवतात . भीमा :"चोळप्पा भाऊ मी त्या लोकांची सांगत सोडली ,पण मला काही त्याचा अर्थ कळेना " चोळप्पा :"भीमराव तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा " भीमा  स्वामीना फुल वाह्तात . स्वामींचे आशीर्वाद घेतात . स्वामी :"काय रे भीमा ,रे  दोन दोन डोकं असून काही उपयोग नाही ,तुझ्हा एक डोका घालवायला हवा " भीमा :"स्वामी तुम्ही भी चेस्टआ  करायला होय " भीमा उठत असताना त्यांची पगडी पडते . भीमा चे डोकं उगड पडत . आणि सगळे हसू लागतात . भीमा रडू लागतात . चोळप्पा :"अहो असा धीर सोडून कसा चालेल ,तुम्ही त्या  लोकांचा विचार करू नका ,लोकांचा काय आहे ,कोणाची  फजिती झालेली पाहून लोकांना हसायला  मजाच येते ," भीमा :"अहो सगळ्या जगानं दोन डोक्याचा म्हणून चिडवले पण म्या कधीच लक्ष्य दिले नाही ,पण आज स्वामींनी .. " चोळप्पा :"भीमराव तुम्हाला दुखावण्यासाठी स्वामींनी काहीही केलेलं नाही, हे काळ्या दगडावरची रेघ आहे हे लक्ष्यात घ्या  ,आहो तुम्ही काय नि मी काय आपण सामान्य माणसं आहोत हो , स्वामींच्या  बोलण्यामागचा आणि कृतीमागचा अर्थ आपल्याला कळत नाही हा आपला दोष आहे ". तिथं आचार्य येऊन परत भीमा ची चेस्ट करतात . चोळप्पा :" भीमराव तुम्ही माझा एक ,स्वामींनी जे काय सांगितलं आहे त्याच्यामध्ये खंड पडू देऊ नका " आचार्य :"भीम्या अरे कोणत्या तरी जन्माचा पाप आहे म्हणून हे तुझ्या डोक्यावर अवाळू आलाय " तिथे स्वामी येतात :"खबरदार ,आमच्या समोर आमच्या भक्ताचा पाणउतारा करतोस ,चल निघ इथून " आचार्य निघून जातात .भीमा परत रडू लागतात .स्वामी :"काय रे भीमा ,अरे अस मुळुमुळु रडतोय काय , अरे  शरीराच्या व्यंगा  पेक्क्षा मनाला व्यंग येणार नाही याची काळजी घे ,अरे  सारखा घाबरणं ,खचून जाणं  ,क्षणा क्षणाला रडणं ,अन्याय सहन कारण हे मनाचा व्यंग ,अरे ताठ मनानं आणि ताठ कंण्यानं जगायला शीक ,उद्या लग्न होणार आहे तुझा ,अरे असा वागला तर बायको काय म्हणेल "  आचार्य हे सगळं लपून बघत असतात  :"बर भीम्या ,मी पाहतो कसा लग्न होतो तुझं  " 

2. दुसरीकडे नाऱ्या भीमा ला लग्नाचा स्थळ आहे असं सांगतो . "स्वामींचा शब्द खरा ठरणार ,मुलगी आणि आई दोघीच घरी असतात ,हुंडा वगैरे काही मिळणार  नाही " भीमा :"मला चालेल,पण त्यांना माज्या अवाळू बद्दल सांगितलं नाही " नाऱ्या :"हे नाही  ,त्यांना फक्त चांगला मुलगा पाहिजे आणी ते तू आहेस ,बाकी ठरत आहे असा दिसला कि सांगू सगळं " 

3. दुसरीकडे आचार्य मुलीच्या आईचा कांन भरतात . त्यांना स्वामी आणि भीमाच्या व्यंगा बद्दल सांगतात . स्वामी ह्यामुळे खूप चिडतात . 

4. दुसरीकडे स्वामी चोळप्पाच्या घरी आहेत . तिथे फुटाण्या येतो आणि स्वामीना जिजा आठवण काढत आहे चला म्हणतात. स्वामी :"काय रे ,नक्की जिजाच आठवण काढत आहे ना" फुटाण्या घाबरून "होय होय तर जिजाच आठवण काडतिया " पण राधा अक्का त्यानं अडवते आणि जिजा ला इथे घेऊन ये पण राधा ला आणू नको असे फुटाण्याला सांगते.  "जिजा इथे आलेली आवडते मला ,तिच्यात माझा कृष्णप्पाच दिसतो ,येताना तु घेऊन  ये जिजाला ,पण त्या राधाला घेऊन येऊ नको" 

5.दुसरीकडे राधा आणि दाजीबा बुवाची वाट बघत असतात . पण फुटाण्या सांगतो कि राधा अक्कानि त्यांना येऊ दिला नाही . 

6.दुसरीकडे चोळप्पा स्वामींचे पाय दाबत असताना :"स्वामी सासू बाईचा म्हणणं ऐकून तुम्ही त्यांच्या शब्दाला मन दिला " स्वामी :"कधी प्रत्यक्षपणे , तर कधी अप्रत्यक्षपणे  सगळं घडवून आणणारे आम्हीच ,फक्त तुम्हाला ते कळत नाही "

7.दुसरीकडे दाजीबा चिडून बसलेत स्वामी ना आल्यामुळे .. पण राधा जिजा ला सांगते :"देवबाप्पा ला सांगायचं ,आता मी तुझ्याकडे आले ना तस तु उद्या आमच्याकडे यायचा " आणि तिला लक्ष्यात राहावा म्हणून एक लाल धागा बांधते .. जिजा फुटाण्या बरोबर जाते . राधा :"मला माफ कर ग जिजा मला माझ्या कामासाठी  तुझा वापर करावा लागतंय ,पण काय करणार ना बाळा तो बुवा आपल्या पोटावर लात मारतोय म्हणून ताईला हे सगळं करावा लागत " स्वामी मात्र हसत असतात :"शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो "


Monday, 23 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 204 "स्वामींनी रंगवलेलं मडकं जमिनीत पुरलं"



1. चंदा पाड्यामागून लपून बघत असते . दाजीबा कालिंदी ला हळूच :"ऐकते आहे ती " त्यावर कालिंदी नाटक करू लागते :"सरकार ,चंदा ची तिच्या संख्या आई पेक्षाही जास्त काळजी घेईन " दाजीबा :"कसा आहे कालिंदी बाई आमच्या राणी सरकार तुमच्या चंदाला सख्या बहिणीसारखा मानतात ,आता तुमची चंदा खुश तर आमचे राणी सरकार खुश ,म्हणून हा सगळा आटापिटा "  सगळेजण हसू लागतात . 

2.दुसरीकडे स्वामी पण हसत असतात . स्वामी :"एक चेहरे पर कितने चेहेरे लागते है लोग ,पण आमच्यापासून काहीही लपलेले नाही " स्वामींचे पाय दाबत भुजंगा :"बरोबर आहे स्वामी ,पण कोण बद्दल बोलत आहेत तुम्ही " स्वामी चिडून :"एका वेळेला एक काम कर , आमच्या डोक्यावरचा भर तू घेऊ नकोस ,सांगू कधीतरी चल " भुजंगा:"ते लोक आले आहते भेटायला ,एक आजोबा पण आलेत ,भेटू द्यायचा का?" स्वामी :"आने  दो "  आजोबा :"स्वामी , मला काही नको ,पण मरण्या आधी गॉड धोड खाण्याची इच्छा आहे   " स्वामी :"बरं आज तुला श्रीखंड पोळी खाऊ घालतो ,जा बस तिथे " तिथे राधा बाई जिजा ला घेऊन येतात .जिजा खुश होते आणि "देव बाप्पा " अशी म्हणते . आणि स्वामी च्या जवळ बसते . राधा :"मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते , मी लै चुकीचे वागले ,आता स्वामी माज्यासाठी देवा प्रमाणेच आहे , माझी जिजा तर त्यांना देवबाप्पाच म्हणते ,हि जिजा माझी बहीण ,ह्याच्या आधी माझ्या जिजा ची खूप काळजी वाटत होती , पण स्वामींनी माझ्या बहिणेला त्यांच्या छात्रछाये खाली ठेवल्या ,पण आता मी निश्चिन्त आहे ,माझी बहीण जिजा जरा वेगळी आहे ,पण तिनेच मला समजावलं ,तेव्हा कुठे मला उपरती झाली ,आता माझ्या जीजेचा देवबाप्पाच माझ देवबाप्पा आहेत " राधा स्वामींना नमसकार करते . राधा स्वामींसाठी श्रीखंड पुरी आणले आहे .स्वामी :"ते आजोबा दिसतायत ,त्यांना खाऊ घाल श्रीखंड पुरी ,म्हणजे ते आमच्यापर्यंत पोहचेल " राधा त्या आजोबाना श्रीखंड पुरी देते पण मनात विचार करते :"ह्या बुवाला आपल्या कडे करायचा असेल तर हे सगळं करावाच लागेल " ते आजोबा श्रीखंड पुरी खाऊ लागतात .राधा बाई मात्र त्यान्च्याकडे रागाने बघत असते . 

राधा अक्का स्वामी येणार आहेत म्हणून खुश आहेत आणि त्यासाठी तयारी करत आहेत ,स्वामींच्या आवडीची ,अंबाड्याची भाजी भाकरी आणि खीर बनवतात . चोळप्पा म्हणतात :"सासू बाई स्वामी काही फक्त आपल्या कुटुंबाचे राहिले नाहीत ,ते सगळ्या अक्कलकोटचे झालेत ,समजा स्वामींना  अचानक कुठे जावं लागला तर तुम्ही जे सगळी तयारी करून ठेवली आहे ती फुकट जाईल ना  " राधा अक्का :"तर तर ,असा बर होऊ देईन मी ,तो जिथं असेल त्याला हाताने धरून घेऊन येईन मी ,त्याला कुठे हि जाऊ द्याची नाही मी " तिथे स्वामी येतात. "शिव शंकर शंभो ,चोळ्या आम्ही आलो बर का " राधा अक्का खुश होऊन :"बैस हो बैस आता आलास ना ,तर कुठे हि जाऊ देणार नाही मी ,छान  बेत केला आहे तुझ्या आवडीचा सगळं , माझ्या वाटणीचा लोणी सुद्धा तुला देणार आहे शी हरी शी हरी  " स्वामी :"वाह वाह चोळ्या , अरे जो पर्येंत आम्ही इथे मुक्काम ठोकला होता तोवर एवढे लाड काय आमचे झाले नाहीत ,जरा मुक्काम काय हलवला तर एवढा प्रेम उतू चाललंय ,हम्म ह्याला म्हणतात अति परिचयात अवज्ञा " राधा अक्का :"असं  काही नाही आहे हो , तुला हवी तेवढी खीर खा ,सगळी संपवलीस तरी मी काही रागवायची नाही " स्वामी :"आगा तू किती हि रागावलीस तरी आम्ही ती खीर तर आम्ही  खाणारच ,पण आता कोणी तरी आमची वाट पाहत आहे  "

3. दुसरीकडे हरी भाऊ घरी येतात :"तू आणि चूलपाशी " कालिंदी :"अहो म्या रोजच तिथं दिसणार आहे,आपली चंदा ,आपल्या घरासाठी केवढा करती " कालिंदी आपला दागिना दाखवते आणि सांगते दाजीबा सरकार नि दिला आहे म्हणून . छंद घरी येते .कालिंदी तिला बसवते . :"चांदुले बैस हा ,मी तुझ्या साठी भाकरी करते,पण आदी मी हा  दागिना काढून ठेवते  " कालिंदी आतमध्ये जातात . हरी भाऊ :"चांदुले ,ह्या कालिंदीच्या बदललेल्या रूप वर जाऊ नकोस हा,उद्या ती परत बिनसले तर तुला वाईट वाटेल "  चंदा :"आरा बा ,दागिन्यांमुळं का होईना त्या माझ्या बरोबर एवढा प्रेमानं वागतायत ,आणि त्यातच मला समाधान आहे बघ ". 

4. दुसरीकडे राधा बाई दाजीबा सरकार ना विडा खाऊ घालते . दाजीबा :"ह्या वेळेला त्या बुवा ला अशी अद्दल घडवायची कि गम्मत आली पाहिजे " राधा :"सरकार अहो डाव काय खेळायचा आणि कधी , हे सगळं ह्या राधान ठरवलंय ,तो बुवा आज रात्री इथं येईल असा बेत केलाय राधान " दाजीबा :"तू बुवा लै हुशार आहे,साधा सुद्धा नाही तो " राधा :"असेल तो बुवा हुशार ,पण मी बी राधा आहे राधा ,या राधा ला तो बुवा नाही कसा म्हणेल ते मी बगतेच "

दुसरीकडे स्वामी त्यांनी रंगवलेलं मडकं जमिनीत पुरतात. त्यावर एक छोटा मडकं  ठेवतात . भीमा तिथे येऊन त्यांना फुलं वाहतो. 

श्री स्वामी समर्थ भाग 203 "दाजिबांनी दिला कालिंदीला दागिना "

 


स्वामी :"राधा बाई आगा नृत्य आणि संगीत हे दैव्यि देणगी आहे , आमचा ठाकूरदास,त्याच्याकडे बघ , त्याला पण सरस्वती प्रसन्न आहे ,पण तो त्याचा उपयोग कीर्तनासाठी करतो ,लोकांना उपदेश देण्याकरिता करतो त्यांना देव समजावा म्हणून करतो ,आगा ह्यांना उपरती झालीय, तुला कधी होणार ?,शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो "  राधा तिथून निघून जाते . सगळेजण स्वामींना नमस्कर करतात . पण राधा चिडून आतमध्ये जाते . राधा :"हे सगळॆ पहिल्यांदाच होत आहे त्यामुळे पचायला जाड जात आहे ". 

राधा अक्का चोळप्पा कडे आलेत . राधा अक्का  खुश होऊन :"आगा येशे हा बुवा काळ रात्री आपल्याकडेच आला होता ,आपल्या घराची सवय झाली त्याला ,आप्ल्या  घराइतका समाधान त्याला कुठे मिळणार " 

जिजा :"कुठे चाललो आपण " राधा बाई :"बाळा आधी चाल तर मागमी सगळं सांगते " राधा बाई आणि जिजा स्वामीं कडे म्हणजे चोळप्पांच्या घरी  येतात  . राधा :"स्वामी मला आता उपरती झालीय ,मला तुमचा शिष्य बनवून घ्या " राधा अक्का मात्र चिडून :"हिच्या सारखी बाई इथे येत काम नाहीं " चोळप्पा :"सासू बाई जरा शांत बसा".  पण राधा अक्का दोघांचा हात धरून  त्यांना बाहेर हाकलायला जातात .बाहेर सगळे गावकरी गोळा होतात . स्वामी :"टेहरो " स्वामी राधा अक्का ना :"काय ग काय चाललंय ,मोठी आहेस ना तू घरी आलेल्या पाहुणायांशी असा वागत का ,बरं हीच सोड हि जिजा ,आगा या लहान लेकराशी तरी नीट वाग ,तुझ्या कृष्णप्पा शी कोणी अशी वागला तर चालेल का तुला "  स्वामी राधा अक्कांना जिजाला खर्वसाची वडे खाऊ घालायला सांगतात .राधा अक्का जिजा ला घेऊन जातात . स्वामी राधा ला :"आम्ही कोणाला शिष्य वैगेरे करून घेत नाही , आमचा भक्तपणा हे हक्कानं कामव्याचा आणि मिरवायचा असता ,आणि हक्काने निभायचा सुद्धा ,आगा नातं असता थेट हृदयापासून  हृदयापर्यंत  पर्येंत बग जमलं तर " राधा बाई स्वामींच्या पायाशी पडते :"स्वामी तम्ही सांगाल तास करणार मी झोकून देईन स्वतःला " राधा अक्का जिजाला  खर्वस देतात .जिजा खुश होऊन खाते . राधा बाई आणि जिजा परत घरी येतात . 

राधा जिजा ला आतमध्ये जाऊन छकुली बरोबर  खेळायला  सांगते . तिथे दाजीबा ,आचार्य आणि सुमुख येतात. आचार्य :"विचार सरकार खडसावून विचार ,गेली होतीस का नाही त्या बुवाच्या पायावर डोकं ठेवायला " दाजीबा आणि राधा बाई मात्र हसू लागतात .दाजीबा :"काय रामाचार्य ,गुप्त कारस्थान फक्त तुम्हीच करू शकता ,राधा आहे ते राधा आमच्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाही ,वाह राधा वाह राधा काय पासा टाकला त्या बुवा वर पण राधा त्या बुवा ला काही शंका तर अली नाही "   राधा नाही म्हणते . रामचार्य :"आला बरा आमच्या ध्यानात , जेव्हा आपण शत्रूला समोरासमोर लोळवू शकत नाही तेव्हा शत्रूच्या गोटात शिरून त्याला लोळवायचा असता बरोबर आहे ना सरकार " दाजीबा :"अगदी बरोबर ,शिका जरा तिच्याकडून " राधा :"सरकार आता बघाच हि राधा काय काय करती ते " सुमुख :"आचार्य हि बाई तर विश्वामित्राची मेनका निघाली ,आता मला हिच्यावर विश्वास वाटू लागलाय ,जे काम तुम्हाला जमलं नाही ते काम हे बाई करून दाखवते का नाही ते पहाच "

दुसरीकडे दाजीबा सरकार चंदाला :"आम्हाला लै काळजी वाटते राणी सरकारांची ,काही केला तरी त्यांच्या ताब्यातील सुधारच होत नाही .. पण त्यांचया समोर असला काही  दाखवता येत नाही ,आम्ही  आतून जर खूप खचुन गेलो हे जर त्यांना कळलं तर ते हतबल होतील ,चंदा तू देखभाल करशील त्यांची ,त्यांना काय हवा काय नको ते बगशील " चंदा :"सरकार तुम्ही ... "  तिथे सुमुख येतो :"सरकार" दाजीबा सरकार :"आताच यायचं होता का मेल्या " सुमुख :"अजो सरकार बातमीच अशी आहे " दाजीबा :"आलोच आम्ही " असे म्हणून निघून जातात . चंदा विचार करते :"काय झाला असेल " स्वामी :"चांदुले, बाळा हा तुझ्या परीक्षा चा काळ आहे ,घबरून जाऊ नकोस आणि त्याला समोर जाताना हा विचार करू नको कोण आपल्या सोबत आहे कोण नाही ,असफलता टॅब निश्चित होती है जाब हात पार हात राखकार बैठं जाते हो " बाहेर छंद ची आई कालिंदी आली असते .तिला दाजीबा सरकार दागिना देतात:"छंद चा वेतन समजा ,आता तुम्ही जवाबदार व्यक्ती म्हणून तुमच्या हातात दिला " चंदा सगळं ऐकत असते . तिला बघून दाजीबा कालिंदीला इशारा करतात आणि हळूच म्हणतात :"ऐकते आहे ती "

Sunday, 22 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 203.0 "राधा बाई होणार स्वामी शिष्य "

 


जिजा :"कुठे चाललो आपण " राधा बाई :"बाळा आधी चाल तर मग मी सगळं सांगते " राधा बाई आणि जिजा स्वामीं कडे म्हणजे चोळप्पांच्या घरी  येतात . राधा :"स्वामी मला आता उपरती झालीय ,मला तुमचा शिष्य बनवून घ्या " राधा अक्का ,चोळप्पा आणि येशू मात्र चिडलेले आहेत .हा राधा बाई चा नवीन कट आहे काय ? स्वामी राधा बाई ला आपले शिष्य बनवतील का? हा पूर्ण भाग पाहण्यासाठी चॅनेल ला सुब्स्क्रिब करा .श्री स्वामी समर्थ . धन्यवाद 

श्री स्वामी समर्थ भाग 201 "स्वामींनी दिली चंदाला फुलं "

 1. राधा जिजा च्या शेजारी बसलेली असते .फुटाण्या :"होय ग राधे कोणी आणला असेल ग पाला " जिजा झोपेत :"देव बाप्पा , तू मला भेटायला ये ,तू नाही आला तर ते मला मारतील " राधा आणि फुटाण्या चिंता करत तिथून बाहेर येतात . राधा :"अरे कुठून आणायचा रे देव बाप्पा " तेव्हा तिथे स्वामी येतात .:"शिव शंकर शंभो " 

 फुटाण्या :"हा आणिक कशाला आला आता इथं . स्वामी आणि राधा त्यांना अडवू लगतात .स्वामी :"आगा वेडे तू कोणाला अडवतेस त्याची कलपना आहे का तुला " स्वामी जिजा कडे  जातात . तिला प्रेमाने कुरवाळू लागतात .जिजा उठून खुश होऊन   :"देव बाप्पा तू आलास " स्वामी :"आम्ही जाणीवपूर्वक पुढून आलोत कारण तुला कळावा कि तूझ्या जिजाचा  देव बाप्पा कोण आहे ते "  राधा चिडून  :"मुद्दामून केलास ना तू हे सगळं ,गावाच्या लोकांना मी माझ्या बाजूनं  करून घेतलेस म्हणून  तू माझ्या बहिणाला फितावलास ,अरे हिम्मत होती तर समोरून लढ्याचं ना " स्वामी :"अजून हि तितकाच विचार करतेस ",हरकत नाही योग्य वेळ आई कि तुझ्हा विचार शुद्ध होतीलच " राधा :"आला मोठा शुद्ध करणारा हि राधा आधीपासून शुद्ध आहे " 

2. दुसरीकडे चंदा , राणी सरकारसाठी वैद्याकडून औषध आणलेला असतं .पण तिथे दाजीबा सरकार बसलेले असल्यामुळें घाबरते .दाजीबा सरकार विचारतात पिशवीत काय आहे  चंदा घाबरून पिशवी दाखवते .त्यात खरंच औषध च्या ऎवजयी फुलं असतात . स्वामी :"चांदुले बाळा नेहमी तू आम्हाला फुलं देतेस आज आम्ही तुला फुल दिलेत " दुसरीकडे चंदा देवयानी बाईसाहेबाना औषदाबद्दल सांगणार असते पण तिथे दाजीबा येऊन सांगतात :"राणी सरकार आम्हाला तुमच्याकडे कबुली द्यायची आहे " राणी :"कसली कबुली " दाजीबा :"अम्ही तुला जे औषध येतो ,म्हणजे नदी काठी एक माणूस राहतो, तो जाणकार आहे जडीबुटीतला ,आम्हाला हि त्याचा औषदाचा बराच अनुभव आहे  " राणी :"मग त्यात कसली कबुली " दाजीबा :"उद्या कोणी तिसऱ्या माणसाने हे सांगितलं आणि तुमचा गैरसमज झाला तर " राणी :"अहो सरकार आम्हाला तुमच्यावर कधीच गैरसमज होणार नाही ,आणि तुम्हाला माहित नाही ना जितका आमचा स्वतःवर विश्वास नाही त्याच्या पेक्षा कितीतरी पटीने तुमच्यावर विश्वास आहे "  दाजीबा सरकार खुश होऊन राणी सरकार ला जवळ घेतात. आणि चंदा कडे पाहून विचार करतात :"चन्दे आम्ही तुझ्यापेक्षा दोन पावले  पुढे आहोत बरं का ,आता तुझा संशय आता दूर झाला असेल कायमचा  " पण चंदा  घाबरलेली असते  . 

3. दुसरीकडे जिजा राधाला एक मुक्का देऊन :"तू आज चांगला काम केलेस देव बाप्पा ला बोलवून  ,तो खूप चांगला आहे " राधा मनात विचार करते :"जिजा ला मी त्या बुवाला भेटू द्याची नाही " राधा तिला गोष्ट सांगून झोपावंते . 

दुसरीकडे एक व्यक्ती स्वामींना :"स्वामी केवळ मनाच्या बळावर तीर्थयात्रा करतोय ,कर्जबाजारी झालोय ,मला कर्जमुक्त करा " स्वामी :"अरे आम्ही ठरलो संन्यासी माणूस, तुला जर आमच्याकडून काही हवा असेल तर ती माती उचल आणि जा घरी " तो व्यक्ती माती ना उचलता तसाच थांबतो :चोळप्पा "स्वामी आज्ञेचा पालन करा " व्यक्ती :"माती घेऊन काय करू " स्वामी चिडून :"नको असेल तर चालत हो " चोळप्पा:" अहो ऐका ,स्वामी आज्ञेचा अवमान करू नका " त्यावर टोमाणूस मातीचा एक ढेकुळं घेऊन तिथून निघून जातो . स्वामी खुश होऊन :"शिव शंकर शंभो. " 

श्री स्वामी समर्थ भाग 202 "अक्कलकोट पेटून उठले"

 1. स्वामी कडून मातीची ढेकळं घेतलेला माणूस विचार करत असतो :"उगाचच मी  इथे आलो " त्या व्यक्तीला ती पिशवी जाड वाटत असते . ती व्यक्ती पिशवी उगडून बघतो तर तिथे त्या मातीच्या ढेकळांचा चांदी झाली असती . ती व्यक्ती :"मातीची चांदी झाली ,स्वामी " असे ओरडत परत स्वामीं कडे येऊन :"स्वामी आपली लीला अतर्क्य आहे , आपण मला जी माती दिली त्याची चांदी झाली ,या पामरास एका फटक्यात सर्वकाही दिला ,मी या ऋणातून कसा उतराई होऊ "

स्वामी :"आता सरळ घरी जायचा ,अरे कर्ज झाला म्हणून तीर्थयात्रेला निघून गेलास , स्वतः पळून गेलास मोकळा झालास ,पण कुटुंबाचा विचार जराही शिवला नाही का रे तुझ्या मनाला , अरे संकट अली कि हाताला हात धरून त्यातयूनं बाहेर पडायचा असतं , फक्त एकट्याचा विचार करण स्वार्थीपणा चाल निघ आता " ती व्यक्ती :"क्षमा असावी स्वामी असा विचार पुन्हा मनाला शिवणार सुद्धा नाही " ती व्यक्ती स्वामींचा आशीर्वाद घेऊन तिथून निघून जाते . तेव्हा तेथे भीमा येतात ,पण भुजंग त्याला म्हणतात :"भीमा नको त्या लोकांसोबत  फिरत असतो ." भीमा :"पण माझं स्वामींवर विश्वास आहे बघा " चोळप्पा:"भीमराव स्वामींना शरण गेलात ना तुमचा कल्याण निश्चित आहे ,फक्त  स्वामींनी नेमून दिलेला काम हे मनापासून करा  " भीमा खुश होतात आणि स्वामींना फुलं वाहतात . तिथे सुमुख येतो आणि दुसऱ्या दोन  गावकर्यांना संध्याकाळी राधा च्या कार्यक्रमाला यायला सांगतो . ती दोन गावकरी दुसऱ्या गावकर्यांना पण सांगून घेऊन जात असतात .स्वामी :"रुक जाओ ,कुठे चाललात " तो गावकरी :"त्याने सांगितल्या मुळे "  स्वामी :"चला आमच्या बरोबर " स्वामी सगळ्या गावकऱ्यांना गावाच्या वेशी बाहेर घेऊन जातात . नारसप्पा :"अयो स्वामी इथे काय आहे " चोळप्पा आणि भुजंग त्यांना थांबायला सांगतात . स्वामी :"शिव शंकर शंभो "असे म्हणताच सगळी घर जळत असतात .स्वामी :"बघा तुमचा अक्कललोट " सगळे गावकरी रडू लागतात .चोळप्पा :"भीमा भाऊ अहो असा काय असं काय करताय " भीमा :"अहो तुम्हाला दिसत नाही होय अहो माझा घर जाळायला लागलाय ,अहो सगळी राख संगोळी झाली "  चोळप्पा ना मात्र असा काही दिसत नाही . चोळप्पा :"स्वामी हे काय लीला आहे ,ह्यां काय दिसत आहे " स्वामी :"हे आहे तुमच्या अक्कलकोटचं भविष्य ,जर त्या बाईच्या नदी लागला तर हे  असच होईल ,जाळणारी घर पेटलेली प्रेतं ,आता तुम्ही ठरवा त्या बाईच्या नादी लागायचा का नाही " सगळेजण रडत :"क्षमा करा स्वामी आम्ही परत त्या तमाशाला जाणार नाही "  स्वामी :"हा निर्णय अंतिम आहे " सगळे गावकरी :"होय स्वामी " स्वामी :"बरं जर तास असेल तर तुम्हाला त्या बाईच्या समोर तास बोलावा लागेल "  गावकरी :"पण ते दाजीबा सरकार " स्वामी :"का...... ,?  धीर खचला "  गावकरी :"नाही स्वामी आम्ही सांगणार ,फकस्त तुम्ही आमच्या पाठीशी उभी राहावा " स्वामी :"प्रत्येक योग्य गोष्टीच्या पाठीशी आम्ही असतोच " सगळेजण स्वामींना नमस्कार करतात . 

2. दुसरीकडे दाजीबा सरकारला येऊन सुमुख येऊन सांगतो कि :"सरकार ,त्यो बुवा संध्या लोकास्नी घेऊन कुठे तरी गेलाय ,तो बुवा जादू टोणा करतो " राधा :"अरे सगळ्या जादू टोण्याच्या वर ह्या राधाची जादू आहे ,आता दाखवतेच जादू " असे म्हणत राधा आत मध्ये जाते आणि पाहते तर तिथे कोणीच नसते . स्वामी तिथे येतात :"राधा बाई....  ,काय शोधतेस ? "  राधा :"कुठं आहेस माझी माणसं , डांबून ठेवलास ना तू त्यांना ,कि जादू टोणा केलास त्यांच्यावर ,आरा गावातल्या  लोकांना त्यांच्या मर्जी प्रमाणे वागू दे की तू कशाला अडवतोस " स्वामी :"आगा आम्ही कोणाला अडवत नाही कि कोणाला बांधून हि ठेवत नाही ,जे चांगल्या मानाने आमच्याकडे येतात त्या आपोआप आमच्याशी बांधले जातात ,या रे " सगळे गावकरी येतात "आम्ही आमच्या मर्जीने केले स्वामींना दोष देऊ नका "  दाजीबा सरकार सुमुख आणि आचार्य पण येतात . स्वामी :"राधा बाई आगा नृत्य आणि संगीत हे दैव्यि देणगी आहे , आमचा ठाकूरदास,त्याच्याकडे बघ , त्याला पण सरस्वती प्रसन्न आहे ,पण तो त्याचा उपयोग कीर्तनासाठी करतो ,लोकांना उपदेश देण्याकरिता करतो त्यांना देव समजावा म्हणून करतो ,आगा ह्यांना उपरती झालीय, तुला कधी होणार ?,शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो "  राधा तिथून निघून जाते . सगळेजण स्वामींना नमस्कर करतात 

Friday, 20 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 201.0 "स्वामी जिजा ला बरं करतील का"

 स्वामी राधा बाई कडे येतात:"शिव शंकर शंभो " . फुटाण्या :"हा आणिक कशाला आला आता इथं " राधा : "ए बुवा तुला जिजा ला भेटता येणार नाही  "

स्वामीं : "आणि जिजा ला भेटल्या शिवाय आम्ही जाणार नाहीं "

श्री स्वामी समर्थ भाग 200 "राधा बाई होणार स्वामी भक्त"

 S1 E200 21st Aug Swami bhaktano namaskar

1. स्वामी  चोळप्पा :"आमचा बाळ आजारी आहे ,त्याला आमची गरज आहे ,जर त्या बाळाचे भोग कमी करता आले असते किंवा किंवा उधार घेता आले असते तर केव्हाच घेतले असते ,चाल आमच्या बरोबर  " असे म्हणून स्वामीं चोळप्पाना  घेऊन जातात .

दुसरीकडे दाजीबा सरकार सुमुख ला चंदा बद्दल सांगतात कि "चंदा खुप तेज  आहे ती आमच्या कक्षा पर्येंत पोहोचली होती . तिला आपल्या कटा  बद्दल कळलं ना तर अगदी गोंधळ होईल " तिकडे राधा चे सहकारी येतात दाजीबा सरकार ला मुजरा करून :"सरकार राधा बाई  ची  बहीण आजारी आहे ,आणि तिला तात्काळ मदतीची गरज आहे " . सुमुख आणि दाजीबा आश्चर्य चकित होतात सुमुख :"सरकार राधा ला बहीण आहे ,तस राधा ने काडी सांगितलं नाही हो " दाजीबा :"असेल लांबची बहीण " आपल्या सेवकाला :"एक काम कर आपल्या राजवैद्य ना ह्यांच्यासोबत पाठव " राधा चे सहकारी तिथून निघून जातात . दाजीबा 

 सुमुख ला :"सुमुख निघ आता , राणी साहेबांचा औषध घेऊन ये पण सांभाळून आपण वैद्य बुवा कडून नाही तर दुसऱ्याच व्यक्तीकडून औषध आणतोय हे कोणालाच कळता कामा नये " सुमुख :"सरकार तुम्ही काळजी करू नका सगळं बरोबर कारेन " चंदा सगळं ऐकते . ती विचार करते:"म्हणजे देवयानी बाईसाहेबांचं औषध सरकार राज वैद्य कडून घेत नाहीत " तेवढ्यात दाजीबा सरकार ची नजर छंद वर जाते :"कुठे चाललीस " चंदा :"बाईसाहेबांसाठी फुलं आणून गजरा करणार होते " दाजीबा सरकार:"ठीक आहे जा "

2. दुसरीकडे राजवैद्य राधा ला :"लहानपणी अशी कोणती घटना घडली होती का "  राधा बाई :"होय आमच्या आईचा आणि बाचं जाणं खुप मनावर घेतलं " राजवैद्य:"ती सारखा  देव बप्पा म्हणते तसा कोणी आहे का  " राधा बाई :"नाही तास कोणी नाही ती मनाचा सांगते ,वैद्य बुवा तुम्ही तिला लौकर बरं कराल ना " वैद्य :"चंदनाचा लेप लावतोय पण तिला सहन होत नाहीय लहान पोर आहे ती ,औषधं तिला पोटातून द्यावा लागेल ,त्याच्यासाठी एक पाला लागेल ,आणि नेमका ती माझ्याकडे नाहीय ,तो पाला ह्या मौसमात नाही मिळत आता हवा असेलतर चमत्कारच व्हावा लागेल " 

3. दुसरीकडे स्वामी आणि चोळप्पा गावाबाहेर एका माळरानावर आलेत .स्वामी :"शिव हरी शंकर , नमामि शंकर , शिव शंकर शंभो " असे म्हणताच तिथे पाऊस येऊ लागतो .आणि माळरानावर जिजा ला हवी असलेली झाड अंकुरत पालवी फुटून बाहेर येते .  स्वामी :"चोळ्या आता आम्ही जे सांगतो ते नीट ऐक "

दुसरीकडे वैद्य बुवानी आपल्या माणसाला तो पाला आणायला  पाठवलेलं असता . तो माणूस येऊन :"सगळीकडे शोधले पण कुठेबीही नाही सापडलं पाला "

राधा :"वैद्य बुवा आता काय करायचं " वैद्य :"आता देवावर सोपवायचा मला क्षमा करा " हे ऐकून राधा खूप रडू लागते .  तेवढ्यात इकडे चोळपा स्वामींनी दिलेला पाला राधा च्या घरात चुपचाप ठेऊन निघून जातात. स्वामी:"शाबास चोळ्या दिलेला काम तू चोखपणे पार पडलास " राजवैद्य निघत असतात तेव्हा ते  फुटाण्याला : "चंदनाचा लेप लावायला सांगा त्यांना बरं वाटेल ,पण जर तो पाला भेटला असता बरं झाला असतं " त्यांचा लक्ष्य चोळप्पा नि ठेवलेला पाला  कडे जाता . वैद्य :"अहो कोणी कुठून कसा आणला माहित नाही ,पण आपल्याला जो पाला  पाहिजे होता ना तो आपल्याला मिळाला  " फुटाण्या :"राधे मी तुला म्हटलं नव्हता खंडोबा आपल्या पाठीशी आहेत " राधा तिथूनच खंडोबाला नमस्कार करते .वैद्य बुवा जिजा चा उपचार करायला जातात .

 4. दुसरीकडे चंदा सुमुख च्या मागे येत असते . आणि सुमुख तिला पाहणारच असतो पण त्याच क्षणी समोर एक बाई आडवी येते आणि चंदा ला पाणी पाजते . सुमख ला चंदा दिसत नाही आणि तो तसाच  निघून जातो .. चंदा त्या  बाई ला :"बरा वाटलं बघा तहानच लागली होती " ती बाई :"बाळा सांभाळून जा " चंदा हो म्हणून पुढे जाते . त्या बाईच्या वेशात स्वामीच असतात आणि ते चंदा ला वाचवायला आले असतात . सुमुख त्या माणसाला :"मी दाजीबा सरकारचा माणूस आहे ,दाजीबा सरकारचा औषध कुठे आहे " सुमख ते औषध घेऊन निघून जातो. चंदा हे सगळं पाहू विचार करते :"खास औषध ,काय गौड बंगाल आहे "

Thursday, 19 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 200.0 "स्वामींनी जिजा साठी माळरानावर उगवले झाड"

राधा बाई :"वैद्य बुवा तिला बारा कराल ना व्हा तुम्ही " वैद्य :"तिला बर करायला एक पाला लागेल आणि तरच उपचार होऊ शकतील ,आणि नेमका तो पाला माझ्याकडे नाही  " हे ऐकून फुटाण्या आणि राधा दोघे पण रडू लागतात .राधा बाई वैद्यांना हात जोडून गुडघे टेकून :"वैद्य बुवा , काई बी करा ,तुम्हाला पाहिजे तेवढा पैका देते मी ,फकस्त जिजा ला बर करा तिच्या वेदना कमी करा " वैद्य बुवा :"जर आताच हवा असेल तर चमत्कारच व्हायला  हवा "

स्वामी आणि चोळप्पा गावाबाहेर एका माळरानावर आलेत .स्वामी :"शिव हरी शंकर , नमामि शंकर , शिव शंकर शंभो " असे म्हणताच तिथे पाऊस येऊ लागतो .आणि माळरानावर जिजा ला हवी असलेली झाड अंकुरत पालवी फुटून बाहेर येते .  

Wednesday, 18 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 199 "स्वामींच्या डोळ्यातून पाणी "

  S1 E199 14th Aug Swami bhaktano namaskar

1. चंदा सगळं झाडून स्वामींना फुलं वाहते .स्वामी :"वाह बाळा ,छान प्रसंन्न वाटलं ,बर का भुजंगा ,चोळ्या  तुम्ही सेवा करण आणि या चंदा ने सेवा करनं ह्यात फरक आहे . प्रत्येक पुरुषाने आपल्यामध्ये एक स्री जपली पाहिजे म्हणजे आपसूकच भावुकपणा येतो, सहनशीलता ,नीटनेटकेपणा येतो ,उगाच नाही काही अर्धनारी घंटेश्वराचा अवतार झाला ,त्याच्या मागे हीच भावना होती  " तिथे भीमा स्वामींना फुलं वाहतो . स्वामी लक्ष्य ना देता मडकं रंगवू लागतात . भीमा जातो . भुजंगा :"चोळप्पा भाऊ हा भीमराव रामाचार्यांचा माणूस आहे ना मग हा काशाला येतो सारखा स्वामी त्याच्या कडे लक्ष सुद्धा देत नाहीत " चोळप्पा :"अहो भुजंगराव असा विचार करू नका स्वामी आपल्या कुठलाच भक्ताला निराश करत नाहीत .भीमरावांच्या हिताचा सुद्धा काहितिरी  विचार स्वामींनी नक्कीच केला असेल "

भीमा ला मध्ये रामचार्य  भेटतात :"अरे भीम्या तुला लाज कशी वाटत नाही ,अरे त्यांचा लक्ष्य सगळं त्या मडक्यावरती आहे ,तुला कळतंय का तुझ्या पेक्षा जास्त त्याला मडकं महत्वाचा वाटतं ,अरे अश्या वागण्याने तुझ्हा लग्न होत नाहीय,तुझा लग्न होणारच नाहो माझं शाप आहे   " भीमा :"आचार्य  मी माझं देव ठरवलंय ,मि स्वामींचा पाय सोडणार नाही   "

2. दुसरीकडे देवयानी बाईसाहेबाना दाजीबा काढा पाजायला येतात . देवयानी बाईसाहेब :"नक्की काय आहे ह्यात ?" दाजीबा घाबरतात :"आमच्या समोरच वैद्य बुवानी काढा तयार केला आहे ,ह्यात ज्येष्ठमध अश्वगंधा असा बराच काहीतरी आहे ह्यात " देवयानी बाईसाहेब :"सरकार आन वैद्य बुवाना औषध बदलायला सांगू ह्याने नाही फरक पडत आहे आम्हाला " दाजीबा :"असा काय म्हणता ,वैद्य बुवानी औषध बदलूनच दिला आहे आम्हाला " सुमुख तिथं येतो "सरकार राजे साहेब प्रचंड चिडलेत तुमच्यावर , काल लखोटा घेऊन आलो होतो मी देवयानी बाई साहेबानाकडे दिला होता लखोटा , त्यात स्पष्ट लिहिलंय " देवयानी बाईसाहेब :"सरकार काय झालाय " दाजीबा :"तुम्ही काय बी काळजी करू नका अहो आजारी माणसाला थोडा विस्मरण होताच " देवयानी :"सुमुख भाऊजी काय झाला " सुमुख :"मी दिला होता लखोटा " दाजीबा :"राणी सरकारनं त्रास देत जाऊ नको ,अरे लक्ष्यात राहत नाही त्यांच्या " देवयानी :"नाही हो आम्ही शोधतो " तिथेच उशी मागे लखोटा सापडतो ..देवयानी :"माफ करा सरकार ,आमच्यामुळे झाला सगळं " दाजीबा :"अहो माफ करा सरकार माझ्या मूळ झाला सगळं "  दाजीबा :"माफी कसली मागताय राणी सरकार यात " तिथे चंदा येते . सुमुख आणि दाजीबा घाबरतात . 

3. दुसरीकडे राधा बाई कडे राधा पुरी तळत असते. फुटाण्या चिडून :"काय ग राधा ,बाकीच्या दासीं कुठं आहेत ,तू कसा स्वयंपाक घरात " राधा :"अरे मीच सांगितलंय सगळ्यांना ,आज फक्त मी आणि जिजा ,आमची आई पण असेच पाकात पुऱ्या बनवायची , तेव्हा मी जिजा असाच तिला मदत करायचो " तेव्हा जिजा हट्ट करते मी पण मदत करते .फुटाण्या सांगतो कि ते गरम आहे भाजेल तुला ,तो कडू औषध देईल तुला .जिजा :"कडू औषध तूच खा ,मी पुऱ्या करणार " फुटाण्या :"अरे विसरलोच मी,देव बाप्पानी सांगितलंय वेगळी चूळ मांडायला  " तेव्हा राधा तिथे  खाली बसते . फुटाण्या :"आगा राधा आपल्याला देव बाप्पा ला बोलायला जायचा आहे ना "  दोघेजण बाहेर जातात . जिजा :"मी ताईला मदत करणार " जिजा गरम तव्या मधून गरम पुरी काढायला जाते . 

बाहेर गेल्यावर फुटाण्या :"राधे ,आगा दाजीबा सरकारने तुझ्या साठी सांगावा धाडलंय " जिजा च्या हातावर गरम तेल सांडत . ती "ताई ताई " अशी जोरात ओरडते . दोघेजण घाबरतात .जिजा बेशुद्ध पडते .  राधा " फुटाण्या जा दाजीबा सरकारला सांग  " फुटाण्या :"आगा पण त्यांना जिजा बद्दल कळेल ना " राधा :"कळू दे ,आपली मदत तेच करू शकतील तिला खुप त्रास होत असणार " फुटाण्या जातो . 

4. दुसरीकडे स्वामी रडत असतात . चोळप्पा :"स्वामि प्रत्यक्ष परमेश्वर आहेत, भक्त्याच्या पायाला ठेच लागली कि पाणी त्यांच्या डोळ्यातून येते , ते सगळ्या जगाची काळजी करतात " स्वामी :"चोळ्या आमचा बाळ आजारी आहे ,जर त्या बाळाचे भोग कमी करता आले असते कीव उधार घेता आले असते तर ते आम्ही कधीच घेतले असते "

श्री स्वामी समर्थ भाग 198 "स्वामींच्या डोळ्यातून पाणी "

 1.   राधा अक्का स्वामींसाठी विडा कुटून देतात . चोळप्पा आणि येशू हे बघून खुश होतात . 

2. दुसरीकडे भुजंग स्वामींना :"स्वामीं ह्या नारसप्पा ला कानडी मध्ये बोलताना ऐकलं ना मला माझ्या मोहिमेची आठवण झाली बघा . मी दक्षिणकच्या समुद्रेजवळ गेलो होतो तेव्हा तिथली भाषा काही काळात नव्हत" स्वामी :"तरीपण तिथल्या मातीनी तिथल्या माणसांनी सांभाळून घेतला नाही का , अरे भाषा हे फक्त माध्यम "

तिथे चोळप्पा विडा घेऊन येतात . स्वामी तो विडा खाऊन :"हा विडा तुझ्या हातचा नाही " चोळप्पा :"अहो हा विडा सासूबाईंनी तुमच्या साठी तयार केलाय ,अहो विदा चक्क चांगला रंगलाय कि " स्वामी :"अरे हा भक्तीचा रंग आहे , बर चल आमच्या झोपायची वेळ झाली आहे " तेव्हा राधा बाईचा तमाशा चालू होतो . भुजंग चिडून सगळं थांबवायला सांगतात . पण राधा बाई "हे बघ स्वतः दाजीबा सरकारनी परवानगी दिलिया तवा मला पाहिजे तिथेच मी खेळ करणार . ते बी या बुवाच्या नाकावर टिचून .या बुवानि माझ्या रंगमहालात येऊन माझ्या रंगमहालचा बेरंग केला ना .त्याचा बदला घेतल्या शिवाय हि राधा गप नाही बसायची "  

चोळप्पा : "स्वामींचा शब्द डावलून कोणी तुमचा खेळ पाहायला येईल असा वाटत नाही मला " पण सगळे गावकरी येतात . राधा :"आले कि सगळे ,ओ चोळप्पा भाऊ ,अहो तुमच्या बुवाची लक्ष्मण रेखा सगळ्यांनी ओलांडली " 

गावकरी आणि भुजंग ,चोळप्पा यांच्या मध्ये वाद विवाद होते . स्वामी दोघांना परत बोलावतात . 

राधा बाई  चा खेळ चालू होतो . पण ढोलकी चा आवाज ना येते टाळ मृदूंग वाजू लागते . सगळेजण घाबरतात .  फुट्याण्या :"नीट वाजवा कि "

खेळ परत चालू होतो . दाजीबा सरकार पण येतात . राधा बाई ची लावणी पण सुरु होते .दाजीबा सरकार खुश होतात. पुन्हा ताल मृदूंगाचे भक्ती गीत सुरु होते . 

दाजीबा सरकार  चिडून :"बंद करा हे, काय राधा बाई काय चाललंय हे,असलंच काही करायचा असेल तर मंदिरात जायचा होत" विजेचा गडगडाट होतो . स्वामींची आकाशवाणी ऐकू येते :"शृंगारातून भक्ती कडे जाणे आम्हाला काही नवीन नाही ,शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो " 

सगळेजण परत जातात 

3. दुसरीकडे राधा बाई घरी जाऊन रडत बसते . जिजा :"ताई तू रडू नको ,मी तुला ना सांगता कुठे नाही जाणार " राधा :"तू तर माझी आई झाली बग  " जिजा :"तू तर माझी रोजच आई होतेस " राधा :"जिजा मी खूप प्रयत्न करते तुझी आई बनायची ,पण मला जमतच नाही ,आपल्या आई ने खूप सहन केलाय ,कायम सरळ मरागने चालत राहिली पण मी मात्र  ... " असे म्हणून राधा मधेच थांबते . आणि दोघेजण झोपी जातात .  तेव्हा तिथे स्वामी येतात आणि दोघांना पांगरून घालतात आणि म्हणतात  :"माणूस चुकत असला कि त्याला काळत नाही ,पण आम्ही आहोत ,आगा आमच्या संपर्कात यायला सुद्धा पुण्याई लागते आणि ते तुमच्यात आहे  ,शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर "  


Tuesday, 17 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 198 promo "शृंगारातून भक्ती कडे"

 राधा बाई ची लावणी सुरु असते . पण त्यांच्या मुखातून भक्ती गीता येत असतात . दाजीबा सरकार  चिडून :"बंद करा हे, काय राधा बाई काय चाललंय हे,असलंच काही करायचा असेल तर मंदिरात जायचा होत" विजेचा गडगडाट होतो . स्वामींची आकाशवाणी ऐकू येते :"शृंगारातून भक्ती कडे जाणे आम्हाला काही नवीन नाही ,शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो " .तर हा भाग इथेच संपतो "श्री स्वामीं समर्थ " हा पूर्ण भाग पाहण्यासाठी चॅनेल ला subscribe करा धन्यवाद 

Monday, 16 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 197 "वेडी असून हि किती आनंदी आहे"

1. सगळे गावकरी ,लहान मुलं आणि सुमुख , रामाचार्य जिजा ला त्रास देत असतात. तिथे स्वामी येऊन सगळ्यांना ओरडतात :"अरे ती बिचारी तिच्या विश्वात रामलीय ,तुमच्यात ढवळाढवलं करत नाहीय तर ती वेडी ,आणि तुम्ही तिला विनाकारण त्रास देताय छळताय तर तुम्ही शहाणे  ,आणि काय रे मनाचा तोल जाणे म्हणजे वेडेपणा असेल तर तिच्या आधी तुमच्या मनाचा तोल गेलाय .अरे पहा तिच्याकडे तिच्या विश्वात रमलीय ती,अरे ती वेडी असून हि किती आनंदी आहे ,आणि तुम्ही स्वतःला शहाणे समजता ना अरे शहाणे असून हि तुम्ही दुःखी आहेत दुःखी ,आणि काय रे ज्ञान पंडित रामाचार्य जखम देणारा वेडा कि सहन करणारा " रामाचार्य चिडून गावकर्यांना ओरडतात  आणि स्वामींना जिजा ला बारा करायला सांगतात:"ए बुवा तिला बरा करून दाखव कि " स्वामी :"तिला कदी बरं करायचा ते आम्ही बघूच ,पण त्याआधी आमच्या एक गोष्ट लक्ष्यात आली आहे,काय आहे काही वेडी माणसं बरं होण्याच्या हि पलीकडे गेलेले असतात  समजल ,निघा " सगळेजण निघून जातात  . स्वामी जिजा च्या डोक्यावरून मायेने हात फिरवत असतात .जिजा सांगते पायात काटा रुतलंय .स्वामी तिच्या पायातून काटा काडतात आणि तिला घेऊन जातात . 

2. दुसरीकडे देवयानी बाई साहेब काळजी करतात की त्याना  काही मोठा आजार तर झाला नाही ना . चंदा ला आठवते स्वामींनी  नीट लक्ष्य द्याला सांगितलं होता . ती काढा आणायचा आहे म्हणून बाहेर जाते . पण ति दाजीबा सरकार वर लक्ष्य द्याला परत आत जाते . तिला शिपाई अडवतो  पण ती बाईसाहेबाचें सामान आणायचा आहे म्हणून जाते .ती दाजीबा सरकार च्या खोलीतील औषध घेऊन विचार करते  :"हे औषध वैद्यांना नेऊन दाखवते आणि विचारते हे कसलं औषध आहे म्हणून " पण तिथं दाजीबा येतात आणि परत या खोलीत यायचा नाही असे सांगतात    

3. राधा बाई आणि तिचा भाऊ,असे सगळेजण जिजा ला शोधत असतात . जिजा घरी परत येते आणि सांगते देव बाप्पा ना तिला परत आणलाय . जिजा झोपायला जाते . राधा रडत बसते आणि विचार करत बसते . फुटाण्या :"देव बाप्पा चा विचार सोड आजच्या कार्यक्रम वर लक्ष्य दे  "

स्वामी रात्री भीमाच्या घरी जातात :"काय रे भीमा काय झाला , आज आला नाहीस ,तुला काय वाटलं आमचा लक्ष्य नाही ,उद्या पासून नियमान आमची फुलं आणायची ,राहील ना लक्ष्यात " भीमा :"हो हो स्वामी आणतो ,नाही विसरणार " स्वामी हसून :"शिव शंकर शंभो " 

श्री स्वामी समर्थ भाग 196 "स्वामींना आईच्या मायेने दटावले"

 1. राधा अक्का स्वामींना येऊन तक्रार करतात कि स्वामीनी काय अवस्था करून घेतली आहे . स्वामी उठून राधा अक्का ला हसून :"ओरड आगा किती दिवसांनी तुझा ओरडा झालाय ,जग  आम्हाला माउली म्हणते पण आज तू आई च्या मायेने दटावलंस छान वाटलं " हे ऐकून राधा अक्काचे डोळे पाणावले असते 

 2. दुसरीकडे सदा न्हावी  रामाचार्य ची  हजामत  करत असतो , सदा :"कधी  योग नाही  आला स्वामींना भेटायचा ,पण तसं झाला तर देवच पावला म्हणायचं .माझ्या हातानं त्यांची दाडी व्हावी एवढीच इच्छा आहे माझी  " आचार्य चिडून पैसे ना देता निघून जातात . 

चंदा स्वामींना भेटायला  येते .पण नरसप्पा  आणि भुजंग समोर कसा सांगावा हे विचार करत असते . स्वामी :"चांदुले बाळा तू काही नाही सांगितलं तरी तुझ्या मनातला गोंधळ आम्ही ओळखतो बारा ,आता एवढाच करायचा जे काही होत आहे त्यावर बारीक लक्ष्य ठेवायचा " चंदा स्वामींना नमस्कार करून निघून जाते. 

3. तिकडे सदा न्हावी स्वामींना पाहत थांबलेला असतो स्वामी :"काय रे सदा आमची दाडी करायची होती ना तुला " सदा विचार करतो :"ह्यांना कसा कळलं ".स्वामी:"अरे आम्ही कुठे का असेना ,जगातल्या सर्व कारभारावर  बारीक लक्ष्य आहे आमचा . पण आमची एक अट  आहे आम्ही काम करत असताना आमची दाडी करायची  " सदा मनातल्या मनात "काम करता असताना कशी दाडी करणार ,जरा जरी हलला आणि वस्त्र इकडे तिकडे झालं तर "  स्वामी :"आमची काळजी करतोस ,अरे हीच तर संधी आहे तुझी कसब दाखवायची ,,तुझी सेवा पसंत अली तर तुला रोज बोलावू नाही तर नाही ,काय मग करतोयस ना दाडी "  सदा हो म्हणून स्वामींची दाडी सुरु करतो .स्वामी हालत असताना हि स्वामींना नं दुखावता दाडी करून दिल्यामुळे स्वामी खुश होतात ."वाह सदा वाह ह्या पुढे तूच आमची दाडी करायचास " सदा खुश होतो .स्वामी :"अरे दाडी तर केलीस पण नख कोण कापणार " त्यावर सदा नख पण कापतो .भीमा हे सगळं लांबून बघतो .आणि तसाच निघून जातो. स्वामी फक्त हसतात . 

4. दुसरीकडे राधा दरवाजा चुकून उघड ठेवून जाते . त्यामुळे जिजा घराबाहेर पडते ,आणि सगळी लहान मुलं तिला त्रास देतात .तिथे आचार्य येऊन विचारतात कोणची आहे हि मुलगी .गावकरी माहित नसल्यामुळें गप बसतात .  सुमख पण तिथे येऊन तिची थट्टा करू लागतो . तिथे स्वामी येतात आणि सर्वाना जोरात ओरडतात.  

Saturday, 14 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 195 "स्वामींच्या आठवणी मुळे राधा अक्कांच्या डोळ्यात अश्रू "

 1. फुटाण्या राधा ला :"आपल्याला गाशा गुंडाळावा लागणार बहुतेक ,ते गावकरी आता तुझा  खेळ पाहायला येतील असा काय वाटतं नाही , तो स्वामी सगळ्यांना झापत होता ,कितीही झाला तर आपण गावात नवीन ,त्या स्वामींनी आपली पाळा मूळ घट रोवून ठेवलेत  राधा :"मग तू का गप बसलायस ,जा कि गावा  मध्ये , शेतावर  जा ,दाखव तुझी अदा सांग लोकांना दुधाची तहान ताकाने भागात नाही म्हणून ,लोकांना लालच दे असा या राधा बद्दल लोकांना सांग त्यांना स्वामींचा विसर पडायला पाहिजे " फुटाण्या :"हो ठीक आहे ,पण तू इतकी तयार होऊन कुठे चालीस " राधा :"आरा हि जिजा सारखा देव बाप्पा म्हणते कोण असेल देव बाप्पा ,काय बी कळेना झालाय बघ ,आपण खंडोबा चा दर्शन घेऊन येऊ " दोघेपण खंडोबाचा दर्शन घ्याला जातात .तिथे चंदा खंडोबाला :"खंडेराया माझी आणि स्वामींची भेट घालवून द्या " स्वामी खंडोबाच्या मूर्तीमागून येतात "इथेच तर आहोत आम्ही ". चंदा :"स्वामी ते दाजीबा सरकार  ,मला काहीपण काळात नाही काय आहे त्यांच्या मनात " दुसरीकडे राधा आणि फुटाण्या मंदिरात येतात .फुटाण्या :"जिजा बद्दल सगळं सांग खंडोबा ला " स्वामी चंदाला :"चांदुले काय गम्मत आहे ना लोकांना देव बाप्पा या शब्दाची देखील भीती वाटत आहे , हा पण देव बाप्पा ह्या शब्दाची भीती तेव्हाच वाटते जेव्हा मनात पाप असते .चांदुले आता खूप लोक येत आहेत आपण नंतर बोलू " चंदा स्वामींना नमस्कार करून निघून जाते .फुटाण्या राधाला :"राधे आपण देवबप्पा बद्दल बोलोलो हे त्या बुवाला कसा कळलं असेल ग " राधा :"ह्यो अजून इथेच आहे होय ,काही नाही शब्दाला शब्द जोडला असेल " स्वामी :"राधा बाई प्रत्येकाला ज्याचा त्याचा काम नेमून दिलाय ,तो योग्य कि अयोग्य हे त्या वेळी कळत नाही  ,पण योग्य वेळ आल्यावर कळतच असो  ,आम्हाला हि निघायचा आहे " 

2. दुसरीकडे जिजा छकुली बरोबर खेळत असते .तेव्हड्यात तिथे स्वामी येतात . जिजा खुश होऊन छकुली ला:"तू आता इथेच बस एकटी आता माझ्याबरोबर देव बाप्पा खेळणार " स्वामी :"जिजा असा नाही बोलायचं ,आता आम्ही नसताना तीच खेळते ना तुझ्याबरोबर ,तुझ्या सोबत कोणी असा वागला तर आवडेल का तुला " जिजा छकुली ला :"ठीक आहे तू इथेच थांब मी आलेच". स्वामी जिजा ला गोट्या खेळायला शिकवतात .पण नेम लागत नसल्यामुळे जिजा रडत असते .त्यावर स्वामी  :"तुझा नेम लागत नाही कारण तुझ्हा चित्त थाऱ्यावर नाहीय ,त्या जामिनावर पडलेल्या गोट्याकडे नीट बघ ,ह्या हातातल्या गोट्यानी एखादया  गोटीवर नीट नेम लाव,पण जर नेम लागला नाही तर रडायचं नाही पुन्हा प्रयत्न करायचा ,आता मार  "  जिजा गोटी मारते आणि तिचा बरोबर नेम लागतो आणि ती खूप खुश होते . जिजा खेळून झाल्यावर "आता मला खूप भूक लागलीय " स्वामी तिला चिंचा आणि बोरा देतात .जिजा खूप खुश होते . 

3.दुसरीकडे फुटाण्या गावकर्यांना गोळा करत असतो :"दिवसभर शेतात किती राबता तुम्ही ,आज रातच्याला तमाश्याला या कीं ,जितेपणी तुम्हाला स्वर्ग पाहायला मिळेल आणि स्वामी आयुष्यभर इथे आहेत कि पण आमची राधा बाई ती जर तिच्या गावाला निघून गेली तर तुम्ही काय कराल ,जाऊदे जातो मी " गावकरी त्याला अडवून म्हणतात "येतो आम्ही "

4.दुसरीकडे राधा जिजा :" जिजा बाळा जेवून घे " जिजा :"मला भूक नाही "  राधा : "जिजा बाळा सकाळपासून तू काहीच खालला नाहीस " जिजा :"मी चिंचा आणि बोरा खळीत " राधा :"कोणी आणलीत " जिजा :"देव बाप्पा " राधा चिडून :"जिजा बस झाला आता देव बाप्पा वैगेरे असा काही नसता  " जिजा :"नाही देव बाप्पा असतं " असा म्हणून रडू लागते .राधा जिजा ला शांत करत :"होय होय असते देव बाप्पा ,ताई नि गम्मत केली " असे म्हणून तिकडून जात असताना तिच्या पायाला बोराची बिया लागतात .ती विचार करू लागते . 

5. दुसरीकडे राधा अक्काना स्वामींची आठवण येत असते .येशू विचार पूस करू लागल्यावर तसं  काही नाही मी देवळात जाते माझंही डोकं शांत होईल म्हणून निघून जाते .स्वामी वटवटवृक्षा खाली बसलेले असतात .त्यांना लांबून राधा अक्का पाहू लागतात आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात . राधा अक्का विचार करतात :"बुवा घरी का येत नाहीस रे ,दिवसभर वाट पहिली तुझी ,थोडा हि वेळ नाही तुझ्या कडे अरे नुसता आरडा ओरडा तरी करून जा  घरातून , माहित आहे मला खूप व्यस्त आहेस तू , अवघ्या जगाचा भार आहे तुझ्या माथ्यावर ,पण तूच म्हणतोस ना माणूस कामात किती हि व्यस्त असला तरी, आपल्या माणसासाठी वेळ काडथोच ,मग आता काय झ्हाला रे " तिथे येशू येऊन राधा अक्काच्या खांद्यावर हात ठेवते . दुसरीकडे वटवटवृक्षा खाली बसलेले स्वामी हसू लागतात 

श्री स्वामी समर्थ भाग 193 "स्वामींनी नरसाप्पाचा हात बरा केला"

1. आचार्य  विचारतात स्वामीं हुक्का का ओढतात आणि त्यानं कोणाचा भल होणार आहे.  तिथे कन्नड भाषिक नारसप्पा चा हात खूप दुखत असतो .स्वामी त्यांना बोलवून :"काय रे हात दुखतोय का ?" नारसप्पा :"हो ?" स्वामी त्या हुक्काचा धूर नरसप्पा च्या हातावर सोडतात .त्यांचा हात बरा होतो .ते बघून आचार्य चिडून  निघून जातात . 

2. दुसरीकडे दाजीबा सरकार :"काय राधा बाई जादू ओसरली का तुमची ? कुठे आहेत मंडळी " राधा बाई :"शक्यच नाही ,अहो सरकार आता कुठे मी आलीय मला लोकांना साद तर घालू द्या " लावणी सुरु झाल्यावर ढोलकी च्या आवाजाने सगळे गावकरी लावणी पाहायला येतात . त्यामुळे वटवृक्षाखाली बसलेले स्वामी खूप चिडतात .चोळप्पा :"काय झाला स्वामी "  स्वामी :"मोह आणि लालसा वाईट रे चोळ्या ,इतका सांगून हि जे नको व्हयायला होता तेच होतंय "

3. दुसरीकडे चंदा स्वामींना भेटायला येत असते. पण कालिंदी तिचा हात पकडून तिला घेऊन जाते . राधा अक्का आणि येशू हे सगळं बघत असतात . राधा अक्का :"आता जर बुवा असता तर ह्या कालिंदी ला चांगलाच धडा शिकवलं असता " येशू :"आई आजकाल तुला स्वामींची फार आठवण येतेय " राधा अक्का :"तस काही नाही हो " 

4. दुसरीकडे स्वामी चोळप्पा ना घेऊन राधा च्या घराजवळ आले असतात . स्वामी चोळप्पा :"तू इथेच थांब मी येतोच " दुसरीकडे जिजा छकुली बाहुली बरोबर खेळत  असते तर तिथे एक नाग येतो .जिजा घाबरून :"देव बाप्पा देव बाप्पा " अशी हाक मारते.  

Friday, 13 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 194 "स्वामींनी वाचवले जिजा चे प्राण"

   S1 E194 11th Aug Swami bhaktano namaskar

1. जिजा च्या खोलीत नाग आला आहे . जिजा घाबरून :"देव बाप्पा देव बाप्पा " असं ओरडत असते . तिथे स्वामी येतात :"रुक जाओ इस्पर हमारी कृपा हैं ,जाब कालं भी इसका कुछ नही कर सकता तो तू क्या खाक करेगा निकाल यहा से " असे म्हणतात ते नाग तिथून निघून जाते .जिजा खुश होते .स्वामी तिच्या डोक्यावरून हात फिरवत :"शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो "

स्वामी अंगाई गीत म्हणून जिजा ला झोपवतात . 


2. दुसरीकडे राधा बाई  ची लावणी सुरु आहे . सगळे गावकरी दाजीबा  खुश होऊन सोने आणि दागिने लुटत असतात. लावणी झाल्यावर दाजीबा :"वाह राधा बाई जादू चालीचं म्हणायची तुमची "

 राधा :"काय मग रामाचार्य , अहो कलंय का नाही तुम्हाला  "


रामाचार्य: "तर काय तो येणारच नव्हता तो घाबरून झोपलाय "


दाजीबा राधा ला पैसे देतात. राधा:"आता बघाच कशी जिरवते त्या बुवाची  "


3. दुसरीकडे चंदा ला स्वामी ना भेटायचं आहे."आज मला स्वामींना भेटायलचह पाहिजे ,दाजीबा सरकारच्या मनात काय चालाय हे कळलंया बगैर मला चैन नाही पडायचा "


4. दुसरीकडे स्वामींचा वाढलेला प्रस्त बघून रामाचार्य ,बंडोपंत आणि नाऱ्या  काळजीत आहेत. रामाचार्य एक उपाय शोधतात.  बंडोपंत आणि नाऱ्या "कसला उपाय विचारल्यावर " रामाचार्य :"कळेल वेळ आल्यावर कळेल " .रामाचार्य भीमा ची पण तक्रार करतात  कि तो स्वामी भजन करतो आणि दोघांना त्याला समजवायला सांगतात . 


5.दुसरीकडे स्वामी चोळप्पा ला :"काल रात्रभर तू त्या राधाच्या घरा बाहेर उभा होतास ,अरे असा करत जाऊ नकोस प्रपंच आहे तुझ्या पाठीमागे "

चोळप्पा :"अहो स्वामी मला तुमची काळजी वाटत होती तुम्ही त्या रिकाम्या घरात एकटे होता ,मला अक्षरशः काही सुचेनासं झ्हाला होता "  स्वामी :"तो घर रिकामा तिथे कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न होता " 


6.दुसरीकडे राधा घरी येते तेव्हा जिजा घरी येते तेव्हा तिला वस्तू खाली पडलेले दिसतात आणि जिजा झोपली होती . जिजा तिला सगळं सांगते .राधा परत गोंधळते कि देव बाप्पा कोण म्हणून . 


7. दुसरीकडे राधा अक्का विचार करत असतात :"आताच त्या बुवाला वटवृक्ष खाली जायची काय गरज होती " येशू येऊन त्यांना सांगते :"आई तू जर अशेच चंदन उगाळत बसली तर पुढचे  ७ दिवस चंदन उगाळून व्हायचे नाही  " राधा :"का " येशू :"आगा तू सानीवर पाणीच घातला नाहीयेस, काय झाला लक्ष्य कुठे आहे तुझ्हा " राधा अक्का :"आगा बाई पाणी घालायचा राहिला ,आगा ते खोड नवीन आहे ना म्हणून ते पाहत होते, आणि आता हा बुवा नाही आहे तर खूप शांतता आहे ना "

चोळप्पा घरी येतात . राधा अक्का :"आज हि तो बुवा येणार नाही का " चोळप्पा :"स्वामी त्यांच्या मर्जीचे मालक आहेत " राधा अक्का :"बारा झाला नाही आला ते आला असता तर माझ्या डोक्याला तापच केला असता "

दुसरीकडे स्वामी गावकऱ्या ना ओरडतात :"हमारे पस क्यू आये हो ,जाओ तमाशा देखो ,खबरदार हमें मु दिखाया तो चल " गावकरी :"चुकला स्वामी आमचा ,माफी द्या पुन्हा अशी चूक होणार नाही ,परत नाही जाणार तिकडं " स्वामी :"एकदा होते ती चूक आणि जो परत परत होतो तो मूर्खपणा " नारसप्प स्वामींना:"स्वामी मला कळलं नाही " स्वामी त्यांना कन्नड मध्ये समजाऊन सांगतात . स्वामी :"आमच्या सोबत राहायचा असेल तर ती वाट सोडावा लागेल "

भीमा स्वामींना फुलं वाहतो  :"हाल मेहरबानी कर राहे हो चाल निघ " भीमा जात असतो तेव्हा नाऱ्या :"भीम्या नको लागू तू या बुवा च्या नादाला ,बघितला कसा हाड तुड करतो तुला ,हि फुलं भिल वाहू नको ,दाजीबा सरकार आणि आचार्य चिडून बसतील अक्कलकोट मध्ये राहणं मिश्किल होईल .तुझा लग्न ठरत आहे ना आता ,आता पैसे कमवण्याचा मागे लाग नको ह्या बुवाच्या नदी लागू. "

श्री स्वामी समर्थ भाग 193.0 "जिजा च्या खोलीत आला नाग "

 राधा :"काय मग रामाचार्य , अहो कालाय का नाही तुम्हाला  "

रामाचार्य: "तर काय तो येणारच नव्हता तो घाबरून झोपलाय "

दाजीबा राधा ला पैसे देतात. राधा:"आता बघाच कशी जिरवते त्या बुवाची  "

दुसरीकडे जिजा च्या खोलीत साप आला आहे . जिजा घाबरून :"देव बाप्पा देव बाप्पा " असं ओरडत असते . तिथे स्वामी येतात :"रुक जाओ  असे म्हणतात "

Wednesday, 11 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 192.0 "चोळाप्पानी भरवले स्वामींना "

 राधा फुटाण्याला : "फुटाण्या गावात जा शेतावर जा सगळ्यांच्या  घरोघरी जा ,आणि अख्या गावाला या राधाच्या पायाशी घेऊन ये "

दुसरीकडे चोळप्पा :"स्वामी बराच उशीर झाला आहे जेवून घेता का " स्वामी:"आता असाच उभा राहणार आहे कि भरवणार आहे आम्हाला?" चोळप्पा :"हो स्वामी " म्हणून स्वामींना घास भरवतात . आता स्वामी पुढे काय करणार पाहू या पुढच्या भागात ?

Tuesday, 10 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 191 "चोळप्पानि केली स्वामींच्या पादुकांची आरती"

 1. स्वामींच्या सांगण्यावरून एक व्यक्ती तिथून निघत असतो . दाजीबा सरकार :"हा दाजीबा चा सुभा आहे ,इथले सर्वे सर्व फक्त आम्हीच आहोत ,आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही इथे असताना हा बुवा तुमचा काही वाकडा करू शकणार नाही " तो व्यक्ती खाली बसतो .आचार्य पण सांगतात ना घाबरता बसायला . सुमुख पण म्हणतो दुप्पट कर लावण्यात येईल त्यामुळे बुवा च्या नदी लागू नका . पण स्वामी सुमुख ला हात वर करून विचारतात :"का रे विसरलास का? देऊ का प्रसाद " स्वामी सगळ्या गावकर्यांना :"आता निघता का देऊ तुम्हाला प्रसाद " सगळे गावकरी उठून निघून जातात . दाजीबा चिडून :"ते बुवा तुझी इथं दादागिरी चालणार नाही " राधा :"होय हे रंगमहाल ह्या राधा चा आहे ,इथं कोण यायचा आणि कोण जायचा हे फकस्त हि राधा ठरवते  " स्वामी :"तुझ्हा महाल तुझंही पाहुणे ,अरे जाहा तेरा ये महाल बसता है वो दुनिया हमारी है ,या कोन  आयेगा कोन  जायेगा ये हम  तय करते है ,अजून हि वेळ गेली नाही सुधार आमचा अक्कलकोट नासवू नकोस ,ये हमारी जहागीर है और हम हिसके पेहरेदार ,हम किसीपे  आच  नाही आने  देंगे,और जो तुम चाहती हो वो हम होणे नाही देंगे चाल  ". असे म्हणून स्वामी निघून जातात . राधा :"ए  बुवा तू कोण रे या राधा ला अडवणारा ,तू या राधाच्या च्या वाकड्यात शिरल्यास आता बघूच कोण चांगली दुश्मनी निभावते ,नाही तुला या राधाने तिच्या तालावर नाचवलं ना तर नावाची राधा नाही मी "


2. दुसरीकडे जिजा ला तिच्या आई वडिलांची हत्या झालेली आठवते ,आणि ती उठून " आई आई  " असे किंचाळून दरवाजा उगड्याला जाते .पण दरवाजा बंद असल्यामुळं परत रडत बसते . तिथे स्वामी येतात आणि तिला मायेनी कुरवाळू लागतात .. जिजा खुश होऊन :"देव बाप्पा तू आलास , मला सोडून नाही ना जाणार , मला माहित आहे तू देव आहेस ,बोल ना " स्वामी :"बाळा ,काय आहे ना शहाणपणा ला मर्यादा असतात ,आणि  वेडेपणाला स्वातंत्र ,मुक्त असतो तो ,शहहाणी ममाणसं चिकित्से च्या मागे धावतात आणि वेळ वाया घालवतात पण तू निर्मळ आहेस ,काही माणसं स्वतः स स्वःता ला ओळखन्यात आक्खी  हयात घालवतात आणि तू आम्हाला ओळखलंस आणि ते हि एकाच नजरेत ",कोण म्हणेल तू वेडी आहेस ,शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो "

सकाळी चोळप्पा स्वामींच्या पादुकांच्या देवाच्या प्रस्थापना करतात ., राधा अक्का ,येशू आणि चोळप्पा सगळेजण आरती करतात . स्वामींच्या पादुकाअसतात तिथे स्वामींचे रूप दिसते  .


3.दुसरीकडे हरी भाऊ देवयानी बाई साहेबांना साठी  पाला  देतात .पण कालिंदी म्हणते " काही पाला द्यायचं नाही उलट त्या एका जागेवर बसल्या मुले काहीतरी गोष्ट चोरून आणायची ,तुला तुझी आईची शपत आहे " . असे म्हणून कालिंदी  ते पाला फेकून देते आणि आतमध्ये जाते .  

 चंदा ती पाला उचलून धउवून घेते :"बाई साहेबाना लौकर बारा वाटले पाहिजे "

दुसरीकडे राधा जिजा कडे येऊन तिला उठवते :"जिजा  ,बाळ जिजा ,उठ बाळा " जिजा :"देव बाप्पा मला सोडून जाऊ नकोस " राधा विचार करते :"देव बाप्पा ,कोना बद्दल बोलत आहे हि , इथे कोण आला होता का ,नाही नाही इथे नाही कोणी येऊ शकत नाही" राधा जिजा ला :"जिजा बाळा कोण आला होता इथं सांग बघू ताईला ,उठून बस बघू ,स्वप्न तर नाही बघितला ना " जिजा :"नाही देवबाप्पा आले होते इथे त्यांनी मला थोपटलं आणि मी घउडुप " राधा :"काय बोलते हि ,इथे खरंच कोणी आला होता का , फुटाण्या " अशी हाक मारते . राधा :"काय म्हणाले देवबपपा " जिजा :"मी तुला शोधत होते ,मग मी पडले ,मग देवबाप्पा आले ,त्यांनी मला उउचललं ,ते मला काहीतरी सांगत होते ,पण ते मला कळलंच नाही ,पण ते खूप छान  होता,आणि ते आले आम्ही बोललो पण ,"

फुटाण्या :"राधे , आगा दाजीबा सरकार आलेत " राधा :"आलेच " असा म्हणून निघून जाते .  जिजा :"देव बाप्पा ,देव बाप्पा " अशी हाक मारते . तिथे स्वामी येतात .जिजा खुश होऊन टाळी वाजवते . स्वामी :"आता तू एवढ्या भापड्या विश्वासाने बोलावले तर आम्ही येणारच ना ,पण आम्ही रागावलो आहे तुझ्यावर ,असा पारोसा राहता का कोणी " जिजा :"पारोसा म्हणजे ?" स्वामी :"पारोसा म्हणजे बिना अंघोळीचा,जा बाराजाऊन छान  स्नान कर बारा " जिजा नाही म्हणते स्वामी :""देव बप्पा चा ऐकणार ना " जिजा :"हो "  स्वामी खुश होऊन :"शिव हरी शंकर नमामि शंकर ,शिव शंकर शंभो "

श्री स्वामी समर्थ भाग 190 "स्वामी पोहोचले राधा च्या रंगमहाल मध्ये "

   S1 E190 9th Aug  Swami bhaktano namaskar

 दाजीबा सरकार राधा ला दागिने आणि पैसे देतात . दाजीबा :"दागिन्यांना आणि पैश्याने मडवीन तुला, फक्त त्या बुवा ला लौकरात लौकर नामोहरम कर  "

राधा :"होणार सरकार तुम्ही सांगताय ना सांधा अगदी तसाच होणार ,कारण त्या बुवांना या राधा बरोबर वाईटपणा घेतलाय ,त्याला नामावणं आता या राधाची गरज आहे ,गावातल्या लोकांचा कैवारी म्हणून फिरतो ना तो ,नाही या गावाला मी माझ्या तालावर नाचवलं ना तर बघाच "


2. दुसरीकडे स्वामी वडाच्या झाडाखाली मडकं रंगवत बसलेत . भुजंगा पहारा देत आहेत .  सगळे जण राधा कडे निघत असतात स्वामी :"बेवकूफ सब के सब गालात रस्ते पे जा राहे हैं " तर तिथे भीमा येतो, भुजंगा त्याला अडवतात आणि भेटू देत नाहीत. स्वामी:"येऊ दे त्याला " भुजंग :"पण स्वामी हा तर आचार्य चा माणूस " स्वामी :"अरे सब बांधे हमारे है और हं सबके ,येऊदे " भीमा स्वामींनच्या चरणात फुलं घालतो . रामाचार्य त्याला बघतात ,"भीमा लाज वाटत नाही तुला ,हे बघ जर तू माझंही माणूस असशील तर माझ्या मागे येशील " भीमा येत नाही आचार्य :"तुला आमच्या पैकी एकाची निवड करावी लागेल " भीमा:"असा असेल तर मी स्वामींची निवड करेल " आचार्य चिडून तीथून निघून जातात . भीमा स्वामींना नमस्कार करतो. 


3. दुसरीकडे जिजा कडे पाहून राधा ,"जिजा" जिजा :"छकुली झोपली आहे त्रास द्याचा नाही त्याला " राधा हे ऐकून रडू लागते . 

नंतर रात्री राधा चे नृत्य सुरु होते .तिथे स्वामी येतात :"रुक जाओ " राधा :"ए बुवा कशाच्या का निमित्ताने होईना शेवटी तू या राधाच्या रंगमहालात आलाच कि,राधा तशी ५२ कशी , बुवा या राधा चा रूप जाला आहे जाला आणि त्याची भुरळ तुला भी पडलीच कि " दाजीबा आणि आचार्य सगळेजण हसतात .स्वामी :"बकवास बंद स्वामी एका गावकऱ्याला : "काय रे पैसे चोरून आणलास ना ",दुसऱ्या गावकऱ्याला "बायकोचा मंगळसूत्र हिसकावलास " दुसऱ्या गावकऱ्याला :"काय रे आई शी खोटा बोललास बैल विकत घेणार होतास ना " त्या ला आठवते आई ने कशी गळ्यातील दागिने दिले होते. स्वामी भीमा ला :"काय रे कालपर्यंत मला फुलं पहिलीत आणि आज हिला गजरा ," स्वामी सगळ्यांना :"चला निघा , या तमाशाच्या व्यसनात अडकू नका "  गावकरी कुजबुज करतात :"काय हा बुवा मध्ये आला ,चांगली लावणी चालू होती " स्वामी :"आम्ही काय करायचा काय नाही हे तुम्ही आम्हाला शिकवायचा नाही "

Monday, 9 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 190.01 "स्वामी पोहोचले राधा च्या रंगमहाल मध्ये "

 राधा च्या रंगमहालात राधा चा नृत्य चालू असते. दाजीबा ,आचार्य सगळेच जमलेले असतात. तिथे स्वामी येतात .स्वामी:"रुक जाओ " असे म्हणतात .. राधा :"ए बुवा कशाच्या का निमित्ताने होईना शेवटी तू या राधाच्या रंगमहालात आलाच कि,राधा कशी ५२ कशी  "स्वामी चिडलेले आहेत .आता स्वामी काय करणार .पाहू या पुढच्या भागात 

श्री स्वामी समर्थ भाग 189 "स्वामींनी सोडले चोळाप्पाचे घर "

  S1 E189 9th Aug  Swami bhaktano namaskar

1.राधा अक्का  कलावंतीण राधा ला स्वामींनी  चांगला धडा शिकवलं म्हणून खुश आहेत. स्वामी आतमध्ये येऊन :"काय ग आमची काळजी वाटते का ,आरती ओवाळणार आहेस " राधा अक्का :"चे मि कशाला आरती ओवाळू तुझही " असे म्हणून राधा अक्का जात असतात पण जाता जाता स्वामींच्या पाया जवळची फुलं उचलून "तुला वाटलं असेल तुझ्या पाया पडले म्हणून माझंही फुलं पडले होते म्हणून उचलले हो शिव हरी शिव हरी " चोळपा :"स्वामी तुम्ही जे सासू बद्दल बोलला होता त्याची हळू हळू प्रचिती यायला लागली आहे बर का  "  स्वामी :"काय आहे ना चोळ्या शुंभ जळालंय  पण पीळ जायचा अजून बाकी आहे हरकत नाही आपण घालवू  ,शिव शंकर शंभो "


2.दुसरीकडे गुरूजी ना दक्षिण देऊन ,"जिवंतपणे आई बापाची सेवा नाही करता आली त्या निमित्तानी एवढाच काय ते "असे म्हणून भोजनाला या म्हणते . गुरुजी पूजेला नमस्कार करून घ्यायला सांगतात . राधा फुटाण्याला नमस्कार करायला सांगते आणि खोली रिकामा करायला सांगते . आतमध्ये राधा जिजा  ला म्हणजे राधा च्या बहनीला ,"हे बघ आई आणि बा ची पूजा केलीय ,हात जोड त्यांच्यापुढें,हात जोड बाळा " पण जिजा पुजेचा  ताट फेकून रडू लागतें आणि वेड्या सारखा वागू  लागते राधा :"जिजा काय झ्हाला बाळा ,विसर आता ते सगळं ,इथं कोणी भी नाही , " जिजा किंचाळत रडू लागते .राधा पण रडत बसते . 


3. दुसरीकडे स्वामीं  सूर्ययाकडे   बघत असतात .राधा अक्का:"आगा येशू सांग त्याला दृष्टी दोष व्ह्याचा " स्वामी :"आगा ज्या तेजाची तू गोष्ट करतेयस ते तेज आम्हीच दिलाय त्याला " येशू :"बरोबर आहे स्वामी पण आम्ही सामान्य माणसं ,आमहाला खूप त्रास होतो तुम्हाला असा बघून " स्वामी :"आगा आमच्या लेकराला परिस्थिती चे चटके बसत असताना आम्ही थोडे चटके सहन केले तर बिघडला काय "


4. दुसरीकडे राधा जीजेचा लाड करते ,जीजू " आई आई असे ओरडते " आणि खुश होते .फुटाण्या आत येऊन ,"राधे बाकी वेळा तिला कोंडून ठेवतेस ,जेजे एकटीच असते ना त्यामुळे तिला त्रास होत असणार ,आपण तिला बाहेर घेऊन जाऊ का " राधा चिडून :"फुटाण्या आज बोललास पुनः  बोललास  तर याद राख  ,जिजा बद्दल मी एक भी शब्द ऐकून घेणार नाही , आज तिची हि अवस्था या दुनिये मुळेच झ्हाली आहि, त्यामुळे तिला मी कधी या दुनिये समोर नाही आणणार तेव्हा ती बरी आणि तिची हि दुनिया बारी " तिथे दाजीबा येऊन राधा ला हाक मारतात . राधा जिजा ला आतमध्ये घेऊन जात असते . पण जिजा ऐकत नाही ..त्यामुळे राधा छकुली रडत आहे असे सांगते . जेजे आत जाऊन बाहुली घेऊन रडत बसते ,"रडू नको छकुली मी इथेच आहे मी कुठे नाही जाणार "

राधा पण रडत असल्यामुळे ति आवरायला जाते आणि फुटाण्याला ""माझा चेहेरा  विस्कटलंय ,फुटाण्या तू थोडा वेळ सांभाळ त्यादजिबा सरकारना मी आलेच "


5.दुसरीकडे स्वामी  आतमध्ये येऊन :"चोळ्या चोळ्या " असे हाक मारतात चोळप्पा येतात . स्वामीं :"आज पासून आमचा मुक्काम त्या वटवृक्षा खाली ,आम्ही या घरात पुन्हा कधी येऊ ते  सांगता येत नाही "

 चोळप्पा स्वामींच्या पाया पडून :"स्वामी मी तुमचा राग सहन करू शकतो पण विरह नाही ,स्वामी मला सोडून जाऊ नका ,आणि जर जाणं  इतकाच महत्वाचा आहे तर मीही येतो तुमच्या सोबत " स्वामीं चिडून :"सारखा काय रे आमच्या मागे ,मागच्यावेळी तुला नेलं कारण त्यात तुझा उधार होता पण या वेळी आम्ही चालो ते आमचा कर्तव्य पूर्ण करायाचं म्हणून .चोळ्या आम्ही संन्यासी माणसं प्रपंच असलेल्या माणसांना आमच्या मागे येण्यात काही शहाणपण नाही ,,जा संसार कर तुझ्या प्रपंचात असू आम्ही ,उठ हे असला काही करून आमचा निर्णय आम्ही बदलणार नाहीय ,चाल उठ " असे म्हणून 

 स्वामी घराबाहेर जायला निघतात . येशू आणि चोळप्पा स्वामींच्या मागे जातात  :"स्वामी ,तुम्ही कायम आमच्याच घरात राहावा हीच इच्छा आहे आमची "स्वामी :"असं बरं " असे म्हणून स्वामी आपले पादुका चोळप्पाना देतात .,"घे ठेव देव्हाऱ्यात आणि कर पूजा अखंड ,पिढ्यान पिढ्या ,ह्यापुढे जो कोणी चोळप्पा च्या घरी येईल त्याला आमचा दर्शन होईल या पादुकांच्या रूपानं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहि " चोळप्पा आणि येशू स्वामींना नमस्कार करतात

श्री स्वामी समर्थ भाग 189.01 "स्वामींनी सोडले चोळाप्पाचे घर "

  S1 E189.01 1st Aug  Swami bhaktano namaskar

 चोळप्पा स्वामींच्या पाया पडून :"स्वामी मी तुमचा राग सहन करू शकतो पण विरह नाही ,स्वामी मला सोडून जाऊ नका ,आणि जर जाणं  इतकाच महत्वाचा आहे तर मीही येतो तुमच्या सोबत " स्वामीं चिडून :"सारखा काय रे आमच्या मागे ,मागच्यावेळी तुला नेलं कारण त्यात तुझा उधार होता पण या वेळी आम्ही चालो ते आमचा कर्तव्य पूर्ण करायाचं म्हणून .चोळ्या आम्ही संन्यासी माणसं प्रपंच असलेल्या माणसांना आमच्या मागे येण्यात काही शहाणपण नाही ,,जा संसार कर तुझ्या प्रपंचात असू आम्ही ,उठ हे असला काही करून आमचा निर्णय आम्ही बदलणार नाहीय ,चाल उठ " असे म्हणून स्वामी 

स्वामीं :"आज पासून आमचा मुक्काम त्या वटवृक्षा खाली ,आम्ही या घरात पुन्हा कधी येऊ ते  सांगता येत नाही " 

स्वामी घराबाहेर जायला निघतात . येशू आणि चोळप्पा स्वामींच्या मागे जातात  :"स्वामी ,तुम्ही कायम आमच्याच घरात राहावा हीच इच्छा आहे आमची "

स्वामी :"असं बरं " असे म्हणून स्वामी आपले पादुका चोळप्पाना देतात .,"घे ठेव देव्हाऱ्यात आणि कर पूजा अखंड ,पिढ्यान पिढ्या ,ह्यापुढे जो कोणी चोळप्पा च्या घरी येईल त्याला आमचा दर्शन होईल या पादुकांच्या रूपानं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहि " चोळप्पा आणि येशू स्वामींना नमस्कार करतात   .श्री स्वामी समर्थ भाग 188 "आमची कृपा पळवता येत नाही" 

Sunday, 8 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 188 "आमची कृपा पळवता येत नाही"

  S1 E188 1st Aug  Swami bhaktano namaskar

1. जगन भाऊ स्वामींनी दिलेलें २०० रुपये फुटाण्या ला देतात . त्यामुळे स्वामी खूप चिडले आहेत. जगन भाऊ स्वामींना खोटे सांगू लागतात :"स्वामी हे गावात नवीन आले होते त्यामुळे त्यांना रास्ता दाखवत होतो" स्वामी:"चूप ,पैसे कश्या करीत दिले होते आम्ही ,तुझी बायको आजारी होती ना ,त्याकरिता हवे होतें ना पैसे ,मग कुठे आहेत पैसे " जगन भाऊ स्वामींचे पाय पडतो ,"स्वामी मला माफ करा ,स्वामी चुकला माझं ,मला राहवलं गेला नाही ,मला माफ करा " स्वामी :"हे पेहली  आणि शेवटची चूक ह्यापुढे जर आहारी गेलास तर आमच्याकडे यायचे नाही . दे इकडे पैसे " जगन भाऊ"बाई पैसे द्या ना तेवढे " राधा :"अहो पाहूण तुम्ही मुदिखाई म्हणून पैसे दिले होते ,आणि राधा एकदा दिलेले पैसे परत देत नाही  " स्वामी:"पैसे तर तुला परत द्यावाच लागतील ,कारण ते त्याला आम्ही दिली आहेत .ती आमची कृपा आहे आमची कृपा पळवता येत नाही ,आमची कृपा एकावर झ्हाली तर ती त्यालाच लाभते " राधा :"अरे बुवा पैसे तर आता मी घेतलंत ,आता मला लाभले नाही तरी चालेलं "  स्वामी :"आगा पैसे घेतलेत पैसे घेतलेत असे म्हणतेस ,एकदा त्या चंची मध्ये बघ तरी आहेत का पैसे " राधा :"हे राधा चे पैसे आहेत ,राधा ला सोडून कुठे जायचे नाहीत " असे म्हणून ती चाचांची मध्ये हात घालून बघते तर त्यात पैसे नसतात .राधा चिडून फुटाण्याला ला विचारते. फुटाण्या माहित नाही असे सांगतो. स्वामी हसत ,"जगन्या तुझ्या खिशात हात घालून बघ " सगळे पैसे जगन च्या खिशात सगळे पैसे मिळतात ..जगन खूप खुश होतोत आणि स्वामींना नमस्कार करतो .स्वामी :"अरे आम्हाला क्षणाचा हि वेळ लागत नाही ह्याचा काढून त्याला द्यायला " असे म्हणून स्वामी निघून जातात . राधा खूप चिडते,"ह्या बुवाला मी आता सोडणार नाही ,ह्याने एकाला माझ्या तावडीतून सोडवला ना  आता मी अख्या गावाला माझ्या तालावर नाही नाचवला ना तर नाव नाही सांगणार राधा "


2. दुसरीकडे देव्यानि राणी सरकार झोपेतून उठल्यावर खाली पडतात आणि जखमी होतात. चंदा देव्यानी राणी सरकार ना जखमेवर हळद लावते आणि वैद्यांना दाखवायचा का असा विचारते. देवयानी राणी सरकार ,"वैद्यांना हि  दाखवून झ्हालाय ,पण काहीच फरक पडत नाहीय "त्यावर चंदा :"मग तुम्ही म्हणत असाल तर स्वामींना सांगु का " त्यावर देवयानी बाईसाहेब :"नको ह्यांना ते स्वामी काही आवडत नाही असुदे वाटेल मला बारा " हे सगळं दाजीबा सरकार पडदे आड लपून बघत असतात . 

दुसरीकडे स्वामी वटवृक्षशाखाली बसलेले असतात अनिसगळे गावकरी स्वामींना नमस्कार करत असतात  . तिथे भुजंग येतात. स्वामी:"काय रे भुजंगा आलास मोहिमेवरून,पराक्रम गाजवल आहेस ,मोठा हुद्दा मिळणार " भुजंगा :"आता आयुष्यभर तुमच्या चरणाशी राहून तुमची सेवा करायची आहे " स्वामी त्यांना आशीर्वाद देतात. 


3. दुसरीकडे दाजीबा सरकार "राणी सरकार अहो काय लागला तुम्हाला ,आम्ही  सगळी महत्वाची काम रद्द करतो ,वैद्यांची इथेच राहण्याची सोया करतो  . राणी सरकार ."माफी असावी पण सकाळी जरा उशिराच डोळा  उघडला आमचा आणि अचानक डोळ्या  समोर अंधारी अली सरकारनाहीतर आम्ही येताच होतो " दाजीबा "तुम्ही आता अजिबात काळजी करू नका तुम्ही आता शांत झोपा राणी सरकार " राणी सरकार:"मग तुमची कामा " दाजीबा :"महत्वाचा काम तर होताच तसा  " राणी सरकार:"मग चंदा ला सांगा करेल ती " दाजीबा :"कसा आहे राणी सरकार ,काही काम बायकोच करू शकते ,आणि बायको शिवाय आमचा पान पण हालत नाही " हे ऐकून राणी सरकार काळजी करू लागतात. 


4. दुसरीकडे राधा :"त्या बुवान ह्या राधा चा अपमान केलाय  आता हि राधा अपमानाचा बदला घेणार ,फुटाण्या आजपासून लोकांना स्वागत मूल्य लावायचा ,हा बुवा समजतो कोण स्वतः ला "  तिथे आचार्य येतात आणि "स्वामीं जादूचे खेळ करतात,तू त्याना बरोबर वटणी वॉर आणशील .  पण राधा त्यांना हाकलून लावते . 

राधा  "फुटाण्या उद्या तिथी आहे,गुरुजींशी बोलणं झ्हाला तुझ्हा  ,फुटाण्या :"फो सांगितलं आहे मी त्यांना. "उद्या आई बाबांचा श्राद्ध आहे ,आज मी  जिथं आहे ना त्याची सुरवात ह्या दिवस पासूनच झ्हाली होती ". स्वामी हे ऐकून चिडलेले आहेत 

Saturday, 7 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 187 "स्वामी राधा वर खूप चिडतात"

  S1 E187 1st Aug  Swami bhaktano namaskar

1. राधा चा नृत्य बघून सगळे जमलेली मंडळी खुश होतात . रामाचारी पण लपून बघत असतात. नाऱ्या बाहेरून येऊन  रामाचारी ना आत घेऊन जातात .


2. दुसरीकडे भीम्या स्वामीं च्या चरणी फुल ठेऊन .स्वामींना नमस्कार करतो. चोळप्पा पण मडकं आणतात . स्वामी:"अरे वाह छान मडकं अंणलायस ". राधा अक्का चिडून ,"जावाई एवढा अनाठायी खर्च करायची काय गरज आहे " चोळपा :"सासू बाई ,मी तुम्हाला विनंती करतो ,अहो आता तरी स्वामींच्या कुठल्याही कृती बाबत शंका घेणं बंद करा, कारण ते जे काही करतात ,त्यामागं कोणाचा तरी भाला असतंच " येशू राधा अक्का ना समजावून आत मध्ये नेते .तर भीम्या विचार करतो ,"मी इतकी फुलं आणली त्याचा काही नाही यांना ,याना फक्त मडक्याचा कौतुक आहे ". स्वामी "भीमा ,तुझ्हा काय झाला ना काम चाळणीघ इथून " भीम्या तिथून निघून जातो .स्वामी हातात मडकं  घेऊन ,"आता तुला हातात घायची वेळ अली आहे ".


3. दुसरीकडे भाऊ रसूल मुंबईला  जाण्याच्या तयारीत असतात .  तेव्हा तिथे एक मुलगा त्यांच्या वाटेत बसला असतो .भाऊ रसूल ची बायको,"काय हवा आहे तुला ,जाऊ दे आम्हाला ,तुला गुळ हवा आहे का ,अरे बोल ना "  तो मूलगा काहीच बोलत नाही.  भाऊ रसूल:"काय रे तुला प्रेमाने बोलेल काळात नाही,उठ नाहीतर हातानी पकडून बाजूला काडीने " तो मुलगा ,"असा कसा तुम्हाला जाऊ देईन ,अगोदर माझे २०० रुपये दे ,मग जा " भाऊ रसूल ला स्वामींना काम झाल्यावर २०० रूपये देण्याचे वाचन केल्याचे आठवते . ते  स्वामींना नमस्कार करतात ,तेव्हा तो मुलगा तेथून गायब होतो भाऊ रसूल ,"स्वामी मला कळलंय तुम्हाला काय म्हणयायचा आहे ".असे म्हणून ते दोघे निघतात. 


4. दुसरीकडे गौर बाई ,"अहो जगन भाऊ मला तर त्यांची परिस्थिती खूपच बिकट वाटतेय ,काहीतरी करा " जगन भाऊ चोळप्पा ना ,"चोळप्पा शेठ अहो काय करू काई बी कळेना बायको चा आजार दिवसोदिवस वाढतंच चालला आहे ,आणि आता इलाज करायला माह्याकडे पैसे नाहीत .,आणि तो वैद्य खूप पैसे सांगतोय ,आता काय करू बायको ला घरातच मारू देऊ " चोळप्पा "अहो जगन भाऊ तुम्ही जरा शांत व्हा ,हे बघा काळजी करू नका काहीतरी मार्ग नक्की निघेल " जगन भाऊ,"अहो कसा मार्ग निंघेल मला तर सगळं अशक्य वाटतंय आता " चोळप्पा ,"जगन भाऊ अहो माझंही स्वामी असताना अशक्य असा काहीही नाही,तुम्ही फक्त विश्वास ठेवा  "  जगन भाऊ,"स्वामी करतील का सगळं नीट " चोळप्पा ."अहो नक्की मदत करतील "

तिकडे भाऊ रसूल येतात ..स्वामी :"काय रे काय झ्हाला चाल निघ " भाऊ रसूल,"स्वामी  खरंच चूक झ्हाली माझ्याकडून मला क्षमा करा " स्वामी  भाऊ रसूल च्या बायकोला :"तू म्हणालीस दर्शनाला जाऊ म्हणून ,आज तू वाचलाय  फक्त हिच्या मुळे " भाऊ रसूल स्वामींच्या पाय जवळ २०० रुपयांची छोटी पिशवी ठेवतात ,"माझी चूक झ्हाली स्वामी " स्वामी :"चूक तर झाली आहे , कारण तू दिलेला शब्द नाही पाळलास ,कारण जो शब्द नाही पाळत तो कधी यशश्वी होत नाही , आम्ही तुला बोलावलं कारण तू यशस्वी व्हावा असा  आम्हाला वाटत होता ."  भाऊ रसूल,"स्वामी क्षमा करा त्यांना आणि हे २०० रुपये स्वीकारा "


5. तिथे जगन भाऊ आणि चोळप्पा येतात आणि जगन भाऊ च्या बायकोच्या आजार बद्दल सांगतात .स्वामी :"तुम्हारे पैंसो का इंतजाम कब का हो चुका है,हे घे जा तिचा इलाज कर  " असे म्हणून स्वामी जगन भाऊ ना २०० रुपये देतात . भाऊ रसूल,"आता मला कळलं कि तुम्ही माझे २०० रुपया का स्वीकारलत " स्वामी :"ये सब हमारा हि तो है ,अरे तुम क्या हमे पैसे दोगे ,ये हमारा खेल है और हमे हि संभालुना है ,शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंभो "


6. राधा तिची नौकरानी आणि फुटाण्या गावात आले आहेत. जगन भाऊ,"ते कोण आहे तिकडं " फुटाण्या :"राधा नाव आहे तिचा तिचा मुखडा पाहायला पैसे मोजावे लागतात . स्वर्गातली अप्सराच आहे जणू  " जगन भाऊ स्वामींनी दिलेलें २०० रुपये फुटाण्या ला देतात .राधा त्यांच्यासमोर येऊन थांबते .पण तिथे स्वामी पण येतात .स्वामी राधा वर खूप चिडतात 

Thursday, 5 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 186 "स्वामी करणार भाऊ रसुल ला शिक्षा"

 S1 E186 1st Aug  Swami bhaktano namaskar 

1. राधा अक्का चोळप्पा चे वाट बघत बसलेत .चोळप्पा आल्यावर सौन्दर्याचे  चे कौतुक करतात . राधा अक्का त्यांना अंगारा लावतात . येशू चिडून ,"तुम्ही सांगाल का कोना बद्दल बोलताय " चोळप्पा :"आगा मी आपल्या स्वामी बद्दल बोलतोय " स्वामी :"बागतीयास काय,आगा आम्ही झपाटलंय त्याला ,आगा एक वेळ त्या राधाने झपाटला असता तर सुटका झाली असती ,पण आमचा झपाटण हे जन्मो जन्मीचा ,पाठ सोडत नाही आम्ही " असे म्हणून स्वामी हसू लागतात ..चोळप्पा :"अहो स्वामी हेच तर आमचा भाग्य आहे " असे म्हणून चोळप्पा आणि येशु स्वामींना नमस्कर करतात . 

दुसरीकडे राधा त्या खोलीत एका मुलीला जेवण द्यायला जाते .पण ती मुलगी तिला खेळणं फेकून मारते . फुटाण्या ,:"एवढी मोठी जखम , सगळं राणीमहाल सजल्य,राधे आता कसा ग व्हायचा "  राधा" " होणार "आवरायला जाते .  राधा ची नोकरांनी तक्रार करते ,"सकाळी जरा पाणी जास्त गरम झाला तर बाईनी मला छडीने मारला आता एवढी मोठी जखम झ्हाली तरी हू नाही का चू नाही " फुटाण्या :"फरक आहे तुझ्यात आणि आतल्या व्यक्ती मध्ये ,कळलं ना "

दुसरीकडे रामाचारी कडे गावकरी राधाचा कौतुक करत असतात आणि त्यांना राधाचा नृत्य बघायला बोलवतात .रामाचारी चिडून म्हणतात ,"वेद शास्त्र पंडित रामाचारी म्हणतात मला ,तुम्ही किती हि म्हणालात तरी आम्ही मात्र मानसिक दृष्ट्या ढळणार नाहीत ,तेवढे आम्ही कणखर आहोत " तरीपण बंडोपंत ,नाऱ्या आणि भिमा राधा चे कौतुक करतात .रामाचारी पण येणार असतात तेव्हा गया ताई सगळ्यांना नाश्त्याला बोलावतात .पण सगळेजणं   न्याहारी झाली आहे असे सांगून निघून जातात. रामाचारी :"आरे जा जा ,आगा तुझ्हा नशीब थोर म्हणून माझ्या सारखा पुण्यवान नवरा भेटलाय ". 

2.दुसरीकडे भाऊ रसूल त्यांच्या बायकोला दागिण्या चा गाठोडं दाखवतात त्यांची बायको :"अहो तुम्ही चोरी नाही केली ना " भाऊ रसूल  स्वामीं ची सगळी लीला सांगतात .त्यांची बायको खुश होऊन स्वामींना भेटायचं म्हणतात . पण भाऊ रसूल :"आधी आपण मुंबई ला जाऊ , आपली सगळी काम रखडली आहेत ,आपले दिवस बदलतील ,आणि मग जाऊ आपण स्वामींना भेटायला ,आणि स्वामीच म्हणतात ना कर्म आधी " स्वामी :"व रे वाह आमच्या म्हणायचं नेहमी सोयीस्कर अर्थ काढता , दुःखात तुम्हाला देव आठवतो आणि मग आनंदात कुठे जातो रे तुमचा देव ,शिव हरिशंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो "

3. दुसरीकडे राधा च्या रंगमहालात राधा ची वाट बघात असतात . तो पर्यंत फुटाण्या नृत्य सुरु करतो,"आणि शिव मल्हारी ,दर्शनाला येतो जेजुरी ". सुमुख :"अरे तू अक्कलकोटच्या आहेस ना मग अक्कलकोटच्या नाव येईल असा काहीतरी म्हण की ". 

तेव्हा वाटाण्या येतो आणि नृत्य सुरु करतो ,"दाजीबा सरकारचा गाव ,पंचकृषीत झालाय त्याचा नाव ,गावामध्ये गाव नाव त्याचा अक्कलकोट ,बाहेर गावचा बुवा बहरतो इथे पोटं ". 

फुटाण्या :"हि समाधि मानस त्या बुवाच्या मागे मागे जात्यात बैलावाणी  "

आणि मग परत राधा चा  कौतुक करतात . 

4. दुसरीकडे भाऊ रसूल  ला झोप येत नसते ,ते  विचार करतात   "हि म्हणते तसा आताच जायला हवा का स्वामीं कडे , नको आधी मुंबई तली कामा करतो,तशीही मी ठरवलेले पैसे देणारच आहे नाही कुठे म्हटलो ,फक्त माझी अडलेली लमा पूर्ण करतो . मग परत येतो मग ,२०० काय ४०० देतो म्हणजे स्वामी हि खुश " स्वामी ह्यावर खूप चिडतात. 

 

Wednesday, 4 August 2021

S1 E185 श्री स्वामी समर्थ : शिष्य च असा आहे तर गुरु कसा असल

  S1 E185 1st Aug  Swami bhaktano namaskar 

1.स्वामी गौरा बाई च्या घराबाहेर झाडा खाली बसलेत. स्वामी :"गौरा बाई भूक लागली आहे , भाकरी दे मला " गौरा बाई:"स्वामी तुम्ही इथे कशाला बसलात ,आत या ना मी करून देते तुम्हाला भाकर  " स्वामी :"इतका वेळ नाही आमच्याकडे इथेच आणून दे लगेच " : गौरा बाई: "स्वामी पण भाकरी शिळी आहे " स्वामी :"चालेल " गौरा बाई :"अहो स्वामी शिळी भाकरी दिली तर पाप लागेल ना मला " स्वामी:"चाललो आम्ही चल " गौरा बाई:"अहो नको नको स्वामी आणते मी भाकर बसा " गौरा बाई भाकरी आणायला आत जातात . स्वामी :"शिव शंकर शंभो " असे म्हणून हसतात . 

2. दुसरीकडे राधा अक्का आणि येशू तुळशी पूजा करत असतात. राधा अक्का :"आगा कोण कुठली कलावंतीण आपल्या गावात येऊन राहिली आहे .या गावाचा ना काय होणार आहे कोणास ठाऊक शिव हरी शिव हरी " येशू  :"आगा देवाचा कार्य करावा ना तेव्हा देवाचा नाव घयावा" तिथे फुटाण्या येतो :"तुम्ही ज्या बाई बद्दल विचारात होता ना तिचा नाव राधा " राधा अक्का:"शिव हरी शिव हरी आगा तिचा आणि माझंही नाव एकच असावा का ?" फुटाण्या :"आहो तुम्ही जसा समजत ना तशी आमची बाई नाहीय, स्वर्गातल्या अप्सरेला लाजवेल इतकी सुंदर,मनमोहक सौन्दर्याची लावण्यवती ,शिवाय खूप मोठी नृत्यांगना सुद्धा आहे ती ,जिचा नाव आहे राधा "  राधा अक्का:"शिव हरी शिव हरी ,आम्हाला काय त्याचा ,तू इथे कशाला आलास ते सांग आधी "फुटाण्या :"म्या बाईंचा निरोप घेऊन आलोय चोळप्पा साठी ,बाईनि त्यांना बोलावलंय " राधा अक्का :"आगा बाई ,शिव हरी शिव हरी ,माझ्या जावई याला कशाला बोलावलंय " चोळप्पा :"बोला काय काम आहे " फुटाण्या :"बाईंनी तुम्हाला मुद्रा विनिमया साठी बोलावलंय ,येता का " चोळप्पा :"चला " राधा अक्का :"चला काय चला लगेच त्याने म्हटल्यावर चला " येशु :"आई आगा स्वामींनी सांगितलं आहे ना " राधा अक्का:"येशे येशे आगा कसा समजाऊ तुला ,आगा आगी  समोर लोण्याचा गोळा ठेवल्यावर लोणी वितळणारच ,चार जुन्या जाणत्या लोकांचे अनुभवाचे बोल आहेत हे ,शिव हरी शिव हरी " चोळप्पा :"सासू बाई अहो माझा काम आहे हे ,मला जाऊ दे तुम्ही काळजी करू नका "   फुटाण्या :"या कि " चोळप्पा "चला " असे म्हणून राधा कढे जातात. राधा अक्का परत चोळप्पा ला थांबवायला जातात . 

3. दुसरीकडे स्वामी भाकरी आधी मुंग्यांना खाऊ घालतात  आणि मग स्वतः प्रेमाने खातात . तिथे एक व्यापारी येतो:"स्वामी मी भाऊ रसूल मुंबई वरून आलो आहे "स्वामी:"ठीक आहे ,खाऊ दे  आम्हाला .तू खाणार आहेस ?" भाऊ रसूल  नाही म्हणतात .स्वामी त्याला आपल्या बाजूला बसवतात. स्वामी  गौरा बाई ला  :"जा ह्याला भाकरी घेऊन ये " भाऊ रसूल:"स्वामी मला भूक नाहीय ,माझ्यामुळे कशाला त्या माउली ला त्रास " स्वामी :"मूर्ख ,दोन दिवस झालं खाल नाहीस ,आणि काळजी ने जेवण हि गेला नाही ना ती आणतोय भाकरी खाऊन घे "

4. दुसरीकडे राधा अक्का परत येऊन हरी ला सोबत घेऊन जावा असे सांगते .पण हरी बाहेर कामावर गेल्या मुळे चोळप्पा तसेच जातात . 

5.दुसरीकडे भाऊ रसूल:"माझ्या व्यापारात खूप मंदी चालू आहे ,खूप कर्ज डोक्यावर आहे ,ह्यातून बाहेर पाडण्यासाठी खूप पैशा ची गरज आहे,स्वामी मला सोडवा ..ह्यातून सुटलो तर तुमच्या चरणी २०० रुपये ठेवीन " स्वामी:"बेवकूफ ,आम्हाला लाच देतोस ,पैसे देऊन कृपा विकत घेतोस अरे भक्ती करतो का व्यापार "   भाऊ रसूल:"तसा नाही स्वामी,फक्त एक कृतग्न्यता म्हणून मी म्हटलं " स्वामी :"बघ हा आता हो म्हणतोयस नंतर माघार घेशील " भाऊ रसूल :"नाही स्वामी असा चुकूनही होणार नाही " स्वामी :"बरं " असे म्हणून पांढरी गोटी देतात ."हि जीवापाड जपायचा ,कोणलाही हिसकावून हि नाही घेता आला पाहिजे ,जा आता आमची विश्रांती ची वेळ झ्हाली आहे " भाऊ रसूल जात असताना एक इसम कुर्हाड घेऊन त्याच्या मागे लागतो . ते पळत पळत जाताना खाली पडतात :"स्वामी मला वाचवा " असे म्हणून डोळे झ्हाक्तात .तो व्यक्ती तिथून निघून जातो .  भाऊ रसूल डोळे उघडून बघतात तर ,त्यांनी एक दागिन्यांच्या गाठोडं सापडत . तिथे स्वामींचा आवाज येतो :"हे तुझ्याच नशिबी होता आणि म्हणून च तुला ईत्पर्येन्त नेला आम्ही " भाऊ रसूल खुश होऊन निघून जातात . आणि दुसरीकडे स्वामी हातात ते कुर्हाड घेऊन हसत असतात. "नमामि शंकर शिव शंकर शंभो "

6.दुसरीकडे फुटाण्या चोळप्पा बद्दल राधा ना सांगतो ."राधे, हे मुद्रा साठी आले होते .लग्न झ्हालाय त्यांचा .आणि एक मुलगा पण आहे ." राधा :"वाटत नाही पाहून ,अजिबात वाटत नाही तुमच्याकडे बघून कि  तुमचे लग्न झ्हाले आहे म्हणून , तुम्ही कवलेच वाटता कि " चोळपा :"जरा लवकर करता का मला बरीच कामा आहेत " राधा :"पाहुणं दमान घ्या कि,इथं सम्धी काम सावकाशच होत्यायत " असा म्हणून फुटाण्या ला आत पाठवते. राधा चोळप्पा कडे पाहत असते .पण चोळपा त्यांच्याकडे बघत नाहीत . फुटाण्या मुद्रा घेऊन येतो .राधा:"घ्या, हे बदलायचे आहेत ,आणि मोबदला तुम्ही सांगाल तो " चोळपा :"नेहमी जेवढा दर देता तेवढाच घेईन "  राधा :"अहो ते तर तुम्हाला मिळेलच कि ,जर तुम्हाला अजून काही हवा असेल तर तेभी  मिळेल ,अहो त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला काहीतरी देऊ शकते ,ज्यांना तुम्हाला आनंद होईल ,अहो पाहूना तुमचा अक्कलकोट खूप प्रेमळ आहे " . चोळप्पा :" हो आणि भक्ती पूर्ण सुद्धा आहे,इथे लोक एकमेकांना अडचणीत मदत हि करतात  " राधा :"होय जशी तुम्ही आमची करतायत ,बार पाहून नाव काय म्हणालात तुमचा "  फुटाण्या :"चोळप्पा " राधा :"हो चोळप्पा तुम्ही ह्या राधा ला मदत केली आहे ,त्याचा मोबदला तर तुम्हाला मिळेलच ,शिवाय या राधाचे रंगमहालचे दरवाजे उघडे असतील कायमचे ते हि अगदी विनामूल्य ,राधा जोवर ह्या गावात आहे ना ,तोवर तुम्ही राधा ची लावणी बघायला कावा भी येऊ शकता ,बर पाहुणं  तुम्ही लावणी पहिली का कधी ?" चोळप्पा :"नाही " राधा :"आहोमांग या कि कधीतरी लावणी बघायला ,ढोलकी च्या तालावर थिरकणाऱ्या माझ्या पावलांचा नाच बघायला " चोळपा हसून :"अहों आम्ही ताल मृदूंगा मध्ये रमणारी मानस ,तुमच्या ढोलकीच्या आवाजाचा आम्हाला काय अप्रूप असणार "  राधा :"मधाच्या पोळ्याला हात लावल्याशिवाय कसा कळल ,कि मधमाशी चावते म्हणून मग काय त्याचा आस्वाद घायला नको?" चोळप्पा :"पण काय आहे माझी इच्छाच नाहीय " राधा :"श्रुंगार हा आयुष्याचा भागच असतो " चोळपा :"बरोबर आहे ,श्रुंगार  हा आपल्या आयुष्याचा भाग असतोच पण श्रुंगार हा नैतिक असावा असा आम्हाला शिकवलंय ,अहो आणि आम्हाला हि मोगऱ्याचा गजरा आवडतोच ,पण तो मोगरयाचा गजरा  आम्ही आमच्या बायकोच्या केसात मळण्य साठी घेतो तो गजरा तुम्हाला कधीच आमच्या मनगटात बांधलेला दिसणार नाही ,किंवा कोणाच्या पायाखाली हि दिसणार नाही " राधा :"तुम्ही ना पहले व्यक्ती आहात ज्याला ह्या राधा ची भुरळ नाही पडली  " चोळप्पा स्वामी चा सुंदर रूप आठवून म्हणतात :"अहो मी इतका अलौकीक आणि अद्भुत रूप पाहिलंय कि आम्हाला या भूतलावर च्या सौन्दर्याच्या काय किंमत असणार ,मी खरा सौन्दर्य पाहिलंय , असो तुम्हाला नाही समजणार. तुमचा हे काम झालं कि तुम्हाला आणून देतो ,येतो मी " चोळप्पा तिथून निघून जातात . फुटाण्या :"राधे हे पाणीच जरा वेगळा आहे,आणि जर शिष्य च असा आहे तर गुरु कसा असल "स्वामी हसून :"शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो "

Tuesday, 3 August 2021

श्री स्वामी समर्थ बहिरशेठ व्यापारी

 S1 E184.0 1st Aug  Swami bhaktano namaskar 

 स्वामी भक्तांनो नमस्कार .स्वामी चोळप्पा ला:"चोळ्या आम्हाला केशराचा उटी लावायची आणि केशर संपलाय.त्या शेजारच्या गावामध्ये तो बहिरशेठ व्यापारी आहे त्याच्याकडे जाऊन केशर आणशील?" राधा अक्का:"ते काही नई ओ  जावई ,ह्या बुवाचा काही एकाच नाही ,संध्याकाळचा बाहेर जायचा नाही म्हणजे नाही "

स्वामी "चोळ्या असा चालणार नाही ,यु आत्ताच्या आता जा लगेच निघ " tar

श्री स्वामी समर्थ 

हे बहिरशेठ व्यापारी कोण ?पाहू या पुढच्या भागात असेच भाग पहाण्यासाठी चॅनेल ला subscribe करा धन्यवाद 

Monday, 2 August 2021

Sri Swami Samarth 183

 S1 E183 1st Aug  Swami bhaktano namaskar

नाऱ्या आणि भीम्या बघतात कि स्वामी कडे भरपूर गर्दी वादळी आहे . भीम्या भाऊ : "नाऱ्या आरा स्वामींनि फकस्त डोक्यावर हात ठेवला, आशीर्वाद भी दिला नाही तरी ह्यो माणूस एवढा का आनंदी झ्हाला रा " नाऱ्या भाऊ : "भीम्या:,स्वामींनी डोक्यावर हात ठेवल्याकी ,समाधान मिळत ,सगळ्या समस्या दूर होतात,सगळं काही ठीक होता असा धीर येत असेल ह्याला  ". 

 भीम्या भाऊ  स्वामींचा आशीर्वाद घेतात .स्वामीं :"तू फक्त आम्हाला फुलं अर्पण कर बाकी आम्ही ठरवू काय करायच तें "

दुसरीकडे दाजीबा सरकार चिडून बसलेत. एक शिपाई येतो दाजीबा त्याला चाबकाचा फटका देतात्त. तो म्हणतो :"सरकार राधा बाई गावात आली " दाजीबा त्याला बक्षीस देतात .दाजीबा :"रंगमहाल सजवायला कळवा "

राधा नृत्य करायला सुरवात करते . पण दाजीबाचं लक्ष्य नसतं . राधा :"सरकार आमचा काही चुकला होय ,तुमचा लक्ष्य नाही आमच्याकडे ,तुमच्या मनात काही चाललंय होय ,सांगा कि राधाला " दाजीबा:"कसा आहे राधा या अक्कलकोटचे फक्त आणि फाफक्त आम्ही राजे आहोत ,पण आमची पकड आता ढिली होत चाली आहे " राधा :"का ?" दाजीबा :"बुवा ,... एक बुवा हाय संध्यासनी नदी लावलाय त्यांना कोण कुठचा बुवा , डोक्यावर ठेऊन नाचतात त्याला ,जादू टोना करतो तो ,जो येतो तो बुवाचंच नामस्मरण करतो ,देव म्हणतात त्याला "  राधा :"काय सरकार तुम्ही ,हे बुवा फक्त नामाचेच असतात ,एकदा का राधाचा घुंगरू चा आवाज आला ना ,कि ताळ चिपळ्यांचा आवाज कोणाला ऐकू येणार आहे. अहो मी राधा .राधा जशी ५२ कशी. ह्या राधाच्या ५२ कशी सोंदर्या पुढं त्या बुवाची जादू फ्हूस. सरकार ह्या बुवाना अख्या गावाला भक्ती मार्गाला लावला ना ,आता हि राधा त्याच गावाला तिच्या तालावर नाचते का नाही ते बघाच . सरकार तुमची या राधाचा फड गावात ठेवा ,मग बघा ही राधा कशी जादू करते ती,नाही ह्या गावाला दारू आणि लावणीच्या कैफात फसवलं ना तर हि राधा नाव नाही सांगणार. सरकार तुमची दहशत परत येणार आणि आखा गाव त्या बुवाला सोडून तुमच्या पायाशी येणार ,अहो हे जबान आहे राधाची "

दुसरीकडे स्वामी हसत असतात . रामाचार्य पण चिडलेत. रामाचार्य :"तू दुर हो ,तू त्या बुवाला भजतेस त्या मुळे माझी ताई पण त्या बुवाच्या नदी लागली आहॆ ". 

तिथे स्वामी येतात :"खबरदार तिला काही म्हणालास तर, अरे ती आमच्या नादाला  लागली आहे कारण तिचा उधार लवकर आहे ,तुझ्या उद्धाराला अजून वेळ आहे पण तुही लागशील .एकूणच काय तर  सगळ्यांनाच आमच्या नादी लागायचा .,शिव हरी शशांकर नमामि शंकर शिव शंकर शंभो ". 

दुसरीकडे देवयानी :"सरकार हि राधा कोण आहे " दाजीबा :"आम्हाला नाही माहित "  देवयानी:"अहो आपल्या वाड्यातील एक दासी आहे ना ती सांगत होती "

दाजीबा :"काय,काय सांगत होती ?" देवयानी:"तिच्या नवऱ्याने म्हणे त्या राधाला पाह्यलंय ,ती खूपच रूपवान  आहे म्हणे आणि तिचा नवरा राधाचा कौतुक करताना थांबतच नव्हता ,खुलं लागल्यासारखा बोलत होता. म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं ,कोण आहे हि राधा ? " दाजीबा :"असेल कोणी कलावंत वैगेरे ,असेल "  देवयानी :"तुम्ही पाहलय का तिला ?"  दाजीबा:"चे चे अजिबात नाही ,आणि खरा सांगू का राणी सरकार जर चुकून लक्ष्य गेला तरी आम्हाला कोणी भुरळ घालू शकत नाही राणी सरकार ,कारण ह्या जगात सगळ्यात सुंदर तुम्ही आहात आमच्या साठी " तिथे चंदा दूध केशर आणते .. दाजीबा :"उत्तम " दाजीबा :"काय ग ए दूध गरम नाहीया ना ? परत हात पोळ्याचा आमचा नाहीतर .,खरा सांगू का राणी सरकार या दुधाची खरी गरज तुम्हाला आहे. तुमचा चेहरा अजून तजेलदार व्हावा म्हणून आम्ही तुम्हाला होतं पंजर आहोत हे दूध " देवयानी :"सरकार काहीतरीच तुमचा ,चन्दा उद्या पळायला जायचा आहे तयारी करायला हवी  ,आम्ही आलोच ये तू ". दाजीबा देवयानी च्या नकळत दुधात काहीतरी मिसळतात आणि तेच दूध देवयानी ला पाजतात. 

 एक व्यक्ती राधा चा नृत्य पाहायला चोळप्पा ना निमंत्रण देतात. तिथे स्वामी येतात. भीम्या भाऊ स्वामींना फुलं अर्पण करतात .स्वामी:"हंम किसीसे बात नाही करेंगे हमे एकांत चाहिये " स्वामी का चिडलेत ?पाहूया पुढच्या भागात श्री स्वामी समर्थ