1. आचार्य विचारतात स्वामीं हुक्का का ओढतात आणि त्यानं कोणाचा भल होणार आहे. तिथे कन्नड भाषिक नारसप्पा चा हात खूप दुखत असतो .स्वामी त्यांना बोलवून :"काय रे हात दुखतोय का ?" नारसप्पा :"हो ?" स्वामी त्या हुक्काचा धूर नरसप्पा च्या हातावर सोडतात .त्यांचा हात बरा होतो .ते बघून आचार्य चिडून निघून जातात .
2. दुसरीकडे दाजीबा सरकार :"काय राधा बाई जादू ओसरली का तुमची ? कुठे आहेत मंडळी " राधा बाई :"शक्यच नाही ,अहो सरकार आता कुठे मी आलीय मला लोकांना साद तर घालू द्या " लावणी सुरु झाल्यावर ढोलकी च्या आवाजाने सगळे गावकरी लावणी पाहायला येतात . त्यामुळे वटवृक्षाखाली बसलेले स्वामी खूप चिडतात .चोळप्पा :"काय झाला स्वामी " स्वामी :"मोह आणि लालसा वाईट रे चोळ्या ,इतका सांगून हि जे नको व्हयायला होता तेच होतंय "
3. दुसरीकडे चंदा स्वामींना भेटायला येत असते. पण कालिंदी तिचा हात पकडून तिला घेऊन जाते . राधा अक्का आणि येशू हे सगळं बघत असतात . राधा अक्का :"आता जर बुवा असता तर ह्या कालिंदी ला चांगलाच धडा शिकवलं असता " येशू :"आई आजकाल तुला स्वामींची फार आठवण येतेय " राधा अक्का :"तस काही नाही हो "
4. दुसरीकडे स्वामी चोळप्पा ना घेऊन राधा च्या घराजवळ आले असतात . स्वामी चोळप्पा :"तू इथेच थांब मी येतोच " दुसरीकडे जिजा छकुली बाहुली बरोबर खेळत असते तर तिथे एक नाग येतो .जिजा घाबरून :"देव बाप्पा देव बाप्पा " अशी हाक मारते.
No comments:
Post a Comment