1. स्वामी चंदा,जिजा,चोळप्पा आणि येशू ना मूठभर चण्याची गोष्ट सांगत असतात. राधा अक्का सगळ्यांना दूध देतात आणि गोष्ट पूर्ण करतात. चंदा जिजा ला :"जिजा तुझ्या हाताला काय बांधलंय " जिजा ला राधा बाईंनी सांगितलेलं आठवते. जिजा :"देव बप्पा उद्या रात्री तू आमच्या घरी येणार ना " स्वामी:"आगा बाळा तुझं मन कसा काय दुखवू आम्ही ,आम्ही येणार तुझ्या घरी येणार तुला भेटायला येणार "
2. दुसरीकडे भीमा स्वामींना सांगतात "स्वामी मला लग्नासाठी स्थळ चालून आलाय, नाऱ्याना त्या पोरीला आणि त्याच्या आईला इथंच बोलावलंय बघा.स्वामी माझा लग्न होणार ना ? " स्वामी मात्र शांत बसलेत .
आई मुलीला घेऊन येतात :"ए नाऱ्या ,माझी मुलगी काय वाऱ्यावर पडलीय ,या भीमाला आवळू आहे ,ह्याच्याशी माझ्या मुलीचा लग्न लावणार होतास ?" नाऱ्या :"आगा जरा हळू बोल कि मी सांगितलं होता कीं" आई :"अरे खोटारड्या ,हे लग्न होणार नाही , हि सोयरीक मोडली " आचार्य तिथे येतात आणि हसू लागतात . आई :"या अक्कलकोटात परत पाऊल ठेवणार नाही ,सगळी खोटारडी लोक राहतात इथे " स्वामी चिडून खाली बसतात आणि त्या दोन रंगवलेल्या मडक्यावर हात ठेवतात. मुलगी म्हणते :"आगा आई , ऐक ना जरा ,आगा काय बिघडला असता " आई :"तुला आता वाटतंय पोरी ,पुढं सगळं आयुष्य काढायचा आहे ,तुझा परत एकदा लग्न मोडला ,आपल्या गरिबी मूळ चांगली स्थळं येत नाहीत आणि आली तर हा अशी येतात .तुझ कसा होणार पुढं कोणास ठाऊक"आईला चक्कर येत असते . भीमा त्यांना पाणी आणतो .मुलगी आईला पाणी पाजते :"आई तुला बारा वाटत आहे ना " भीमा:"त्यांना काय होतंय " मुलगी :"त्यांना रक्तदाबाचा त्रास आहे आणि ते माझ्या मुळेच आहे , माझा लग्न जुळत नाही म्हणून त्याची सतत चिंता करत असते, तुमच्या
स्थळा कडून त्यांना खूप अपेक्षा होतीं ,इथे जमेलच असा वाटलं होता ,पण हे असा झाल्यानं तिला सहनच झाला नाही " भीमा :"अहो पण हे असा झाल्यानं त्यांच्या जीवावर बेतेल कि " आई :"आगा ह्यांच्या सोबत बोलत काय बसलीस ,कसं तरी होतंय " भीमा :"आई तुम्ही काय भी काळजी करू नका , अहो अक्कलकोटचे हवा लै शुद्ध आहे ,सगळं व्यवस्थित होईल ,तुम्हाला बारा बी वाटेल " भीमा खाली बसून त्या मुलींच्या आईचे पाय चोळू लागतो :"आई, तुम्हाला पोरीचा लग्न माझ्याशी नाही ना करायची ,नका करू ,तुम्हाला खरा सांगू का , बारा झाला हे लग्न मोडला ,अहो माझ्या पेक्षा चांगला मुलगा तिच्या नशिबात असेल ,म्हणून हे लग्न मोडला असा समजा ,अहो एवढा नक्षत्रासारखी मुलगी तुमची ,म्या स्वतः खटपट करेन ,असा पोरगा बघेन जो फक्त नारळ घेऊन तुमच्या पोरींशी लग्न करेल पण तुम्ही काळजी करू नका ""आई आता बारा वाटतंय ना तुम्हाला ,म्हणजे शांत वाटतंय ना तुम्हाला " आई :"होय आता बारा वाटतंय शरीर आणि बुद्धी ठिकाणावर आहे " आई उठतात . भीमा :"आई ,तुम्ही काळजी करू नका ,म्या बैलगाडीची लगेच व्यवस्था करतो त्यात बसून जावा " आई :"त्याची काही गरज नाही ,म्या एक विचारू का?" भीमा :"विचारा ना " आई :"तुम्हाला कोणती वेळ सोईस्कर आहे ते सांगा म्हणजे तुमच्या लग्नाचा मुहूर्त काढू या " सगळेजण खुश होतात. भीमा :"म्हणजे आमचा लग्न " आई :"हो ना , अहो तुमच्यासारखा चांगला आणि मोठ्या मनाचा मुलगा आम्हाला कुठं मिळणार आहे ,मी तुम्हच्या बद्दल इतका वाईट बोलले ,नावं ठेवली ,लग्न मोडून निघाले होते पण तुम्ही आमचं चांगलाच विचार केला ,तरीपण तुम्ही माझी इतकी चांगली काळजी घेतली ,मला सांगा कुठून मिळणार तुमच्यासारखा चांगला मुलगा ,तुम्हीच माझ्या मुलीला सुखात ठेवाल " भीमा :"आई ,हा तुमच्या मनाचा मोठेपणा ,पण तुमच्या मुलीला विचारा ना म्या त्यांना पसंद आहे का म्हणून " आई :"काय ग पसंद आहे ना " मुलगी हो म्हणते .आचार्य :"म्हातारे ,आगा मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ,आगा तिला आयुष्यभर भोगावा लागेल या भीम्या मूळ " स्वामी चिडून :"काय रे दुसऱ्याचा भलं बघवत नाही ना तुला " आचार्य:"या मुलीच्या आयुष्यात काय भलं होणार आहे, ह्याच्याशी लग्न केला ना आयुष्यभर सोसावा लागणार आहे तिला " स्वामी :"अरे काय सोसायचा ते ती सोसेल ना ,तुला काय अडचण आहे,चाल "
भीमा :"स्वामी पाय पडतो " स्वामी :"ते पाय बाय नंतर जा दगड घेऊन ये " भीमा स्वामींना दगड आणून देतात. स्वामी :"हुंडासा काढ ,काढ म्हटलं ना " भीमा डोक्यावरचा हुंडासा म्हणजे पगडी काढतात . स्वामी :"भीमा ,आमची लेक आहे ती , आमच्या लेकीचा लग्न करतोय ,आणि आम्हाला हा असा दोन डोक्याचा जावई नकोय ,एकच डोकं हवा आणि ते हि ताळ्यावर हवा ,काय " असे म्हणून स्वामी त्या दोन मडक्यातील एक छोटा मडकं उचलतात :"शिव हरी शंकर ,नमामि शंकर ,शिव शंकर शंभो "
No comments:
Post a Comment