स्वामी चोळप्पा ला एक पुडी देतात . आणि :"चोळप्पा वेळेवर आलास ,हे त्या सदाच्या बायकोला ,तिलोत्तमा ला नेऊन दे ,विष आहे म्हणावं " सगळेजण घाबरतात. सोनबा , तारा अक्का ,नरसप्पा कोणालाच काही कळत नाही . चोळप्पा पुडी घेऊन जातात . दुसरीकडे निर्मला च्या जखमांवर आज्जी मलम लावते आणि मग तिला फुटाणे खायला बाहेर पाठवते . आणि निलोत्तमा ला बजावते ,"पुन्हयांदा जर माझ्या नातीला हात लावलास तर तू आहेस आणि मी आहे "
तिलोत्तमा :"मग तिला काळत नाही , आपलया आईला खोटं ठरवायला " तिथे चोळप्पा येतात आणि विषाची पुडी देतात आणि :"हि पुडी स्वामींनी तिलोत्तमा वाहिनी ला द्याला सांगितलं आहे" आजी म्हणते :"तिलोत्तमा मगाशी घेत होती ना विष ,मग आता घे, स्वामीं पासून काही लपून नाही " तिलोत्तमा :"नाही मी विष घेणार नाही " पण चोळप्पांच्या संगणवरून तिलोत्तमा उघडून बघते ,तर त्यात सोन्याची नाणी असतात . आजी विचारते ह्याचा अर्थ काय घ्याचा चोळप्पा . चोळप्पा :"स्वामींना असा सुचवायचं असेल ,कि गैर मार्गाने मिळवलेला पैसे हा विष प्रमाणे असतो" दुसरीकडे झाडाखाली स्वामी :"वाह चोळप्पा ,योग्य सल्ला दिलास, सदा आम्ही तुला इशारा दिला आहे बरं" चोळप्पा येतातं आणि घडलेलं सगळं सांगतात :"स्वामी जे काही सांगतात त्यात काहीतरी बोध असतो,त्याचा शब्दशः अर्थ घ्याचं नाही ,तो आपण ओळखणं गरजेचं आहे ". स्वामी सेवकर्यांना :"कळलं का आम्ही चोळप्पा ला का सांगितलं ,तुम्हाला जमलं असता कि तिलोत्तमा ला विष द्याला ,बेवकूफ दुसर्याबद्दल मत्सराची भावना लगेच तयार होते तुमच्या मनात ,जराही वेळ लागत नाही " स्वामी वेगाने तिथून निघून जातात आणि सगळे सेवेकरी त्यांच्या मागे मागे जातात . स्वामी जंगलात येतात. सगळेजण गोंधळून जातात . स्वामी :"चोळ्या मगाशी हातघड्या घालायची तयारी होती ना ,काढ ते पायताण आणि चल, काट्यावर" चोळप्पा हसत हसत स्वामींच्या मागे मागे येतात . सगळेजण स्वामींना नमस्कार करतात.
No comments:
Post a Comment