जय जय श्री स्वामी समर्थ भाग 223. promo ":"बेवकूफ हमारे पेढे भूल गया"
आचार्य आणि श्री दत्त गुरु भक्त दोघे जण स्वामींकडे येतात . नारसप्पा:"हा आचार्य इथे कशाला आला म्हणायचं आता. " आचार्य :"हाच तो बुवा दिसतंय का ह्यात काय विशेष" तो व्यक्ती :"श्री गुरुदेव दत्त " असे म्हणून स्वामींना नमस्कार करतो . स्वामी चिडून :"बेवकूफ हमारे पेढे भूल गया"
आचार्य:"ह्याची मानसिकता ओळखणं कठीणच ,जाऊदे आपण आपल्या व्यव्हाराचं बोलू ,या " चोळप्पा:"आचार्य आमच्याच घरी येऊन आमच्याच स्वामीं विषयी एक हि उना दुणा मी ऐकून घेणार नाही " स्वामी दत्त गुरु भक्त व्यक्ती ला नमस्कार करून :"नमस्कार आपली ओळख " तो व्यक्ती :"मी श्रीरंग भट्ट" चोळप्पा :"मी चोळप्पा ,स्वामी सेवक ,स्वामींना जे सांगायचं ते जर आपल्याला काळाला तर पुढचा सगळं सोप्पं होऊन जातो" मग अचानक श्रीरंग भट्ट स्वामींचे पाय धरतो :"स्वामी मला क्षमा करा मी आपला देणं द्याचा विसरलो " आचार्य :"अहो डोकं फिरल्या का काय तुमचं ,या बुवाला तुम्ही पह्लीयांदा भेटताय ना ,मग तुम्ही याचा असा काय देना लागताय" श्रीरंग भट्ट :"नाही मी काही वर्षांपूर्वी , पोटशुळाच्या ब्याधीने गांजून गेल्तो ,माझं पोटशूळ जाऊदे मी सेवा रुपयाचे पेढे ठेवेन ,पण माझा पोटविकार बारा झाला पण मी नवसाचा विसरलो ,स्वामी तुम्ही मला नवसाची आठवण करून दिली ,स्वामी मला क्षमा करा ,मी गरज सरो आणि वैद्य मारो असा वागलो, स्वामी आपण साक्षात दत्तस्वरूप आहेत , आता मी नवस आपल्या चरणाशीच फेडतो ,श्री गुरुदेव दत्त " स्वामी :"शिव शंकर शंभो"
दुसरीकडे कृष्णप्पा आईला मदत करत असतो आणि देवाचा नाव घेतो . तो सांगतो :""स्वामी आजोबानी सांगितलं आहे ,सगळ्यांशी चांगला वागायचं ,देवाचा नाव घ्याचा ,चांगला वागलास तर मी तुला पेढा देईन , मी तुला एक पेडा देईन ,मला अर्धी वाटी खीर दे" राधा अक्का खीर नाही देत. कृष्णप्पा चिडून बाहेर येतो. बाहेर श्रीरंग भट स्वामींना पेढ्याचा नवस पूर्ण करतात.स्वामी ते पेढे कृष्णप्पा ला देतात . कृष्णप्पा सगळ्यांना पेढे वाटतो . आचार्य चिडून निघून जातात . श्रीरंग भट्ट:"स्वामी आपला आशीर्वाद सदैव पाठीशी असू द्या " स्वामी :"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे "
दुसऱ्या दिवशी स्वामी चोळप्पाना नक्षत्र विचारतात. चोळप्पा स्वाती नक्षत्र आहे असा सांगतात . स्वामी :"चोळ्या ,स्वातीचा एक थेंब ह्या शिंपल्यावर पडल्यावर ह्या शिम्पल्याचा मोती होणार,शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो " आणि तसाच होते .स्वामी :"चोळ्या आमचा मोती तयार व्हायला सुरवात झाली "
दुसरीकडे बाळप्पा दोन पाण्याची मडकं घेऊन गावात येतात त्यांच्या पायातून रक्त येत आहे . गावकरी त्यांना नमस्कार करतात . एक गावकरी :"काही झाला तरी नियम चुकत नाही बाळाप्पांचा " दुसरा व्यक्ती :"इतके नौकर चाकर असताना बाळाप्पा इतके कष्ट का घेतात,अपार शिव भक्ती ,शिव शंभोच्या अभिषेकासाठी लांब नदीवर जाऊन पाणी आणतात " घरी जाऊन बाळप्पा शंकराला ला अभिषेक करतात त्यांची मुलगी फुलं आणते आणि बायको बेलाचे पण आणते
दुसरीकडे कृष्णप्पा स्वामींना विचारतो :"स्वामी आजोबा मोती तयार झाला असेल ना आता " स्वामी :"इतक्यात कुठे रे बाळा ,अरे आता कुठे स्वातीचा थेम्ब पडलाय ,मोतीने आकार घायला सुरवात केली आहे अजून तर बराच वेळ आहे आणि आकार घेताना बराच सोसावा लागतं आणि आकार घेताना बराच सोसावा लागत "
No comments:
Post a Comment