Avoid Copy Paste

Saturday, 11 September 2021

जय जय श्री स्वामी समर्थ भाग 221 promo "कृष्णप्पा आला घरी परत"

 --जय जय श्री स्वामी समर्थ भाग 221 promo "कृष्णप्पा आला घरी परत"



राधा अक्का शिंपला मिळावा म्हणून  कालव्यात हात घालून बघतात . कुठेच शिंपला सापडत नाही. तिथे स्वामी ,कृष्णप्पा आणि चोळप्पा येतात आणि आणि कृष्णप्पा सांगतो :"इथं आहे,हा घे कि " असे म्हणून शिंपला दाखवतो. राधा अक्का खुश होतात आणि कृष्णप्पा ला छान गोष्टी सांगेन, खाऊ देईन असे सांगते . स्वामी राधा अक्का ला शिंपला द्याला सांगतात . राधा अक्का कृष्णप्पा कडून  शिंपला घेऊन स्वामींना देते .   

दुसरीकडे तिलोत्तमा परत स्वामींची नख पाहिजे म्हणून भांडू लागते. सदाची आई "काय झाला असे विचारते " सदा विचार करतो :"आता कुठे बारी झाली आहे ,तिला सांगितलं तर काळजी करत बसेल ,नको तिला सांगायला " "तो नको विचार करुस तुला तर तिचा स्वभाव माहीतच आहे कि "

तिथे निर्मला येते आणि रडत असते . ती पाणी आणत असताना सुमुख तिचा मडक फोडतो. निर्मला :"अहो तुम्ही माझ्या मागं का लागलाय" सुमुख ":आधी मी तुझ्याशी लग्न करणार आणि मग तुझा नाव सुमुखी ठेवणार , आणि हे जर कोणाला सांगितलं तर तुला बघून घेईन , मी दाजीबा चा खास माणूस आहे " निर्मला घाबरून  :"नाही मी नाही सांगणार " निर्मला घरी येते आणि दगड लागला आहे असा खोटं सांगते. सदा विचार करतो "नक्की काय झाला असेल ,काहीतरी विपरीत झाला नसेल ना ". 

दूसरीकडे स्वामी कृष्णप्पा सोबत गोट्या खेळत असतात. तिथे राधा अक्का कृष्णप्पा ला खीर देते असे सांगते. कृष्णप्पा म्हणतो स्वामी आजोबा मला पेढे देणार आहेत. राधा अक्का चिडून निघून जाते. कृष्णप्पा स्वामीना पेढे मागतो. स्वामी :"बाळा ,असा अमिश दाखवून आम्ही कोणाला आमच्याकडे  बोलवत नसतो, आधी स्वतःची पात्रता सिद्ध करायची असते ,ते कर आधी " कृषणप्पा :"म्हणजे ,नेमका मी काय करू " स्वामी :"म्हणजे सगळ्यांशी छान वागायचं ,एक चांगला माणूस व्ह्याचा ,आता हुशार झाला आहे ना आमचा कृष्णा ,मग आता आई बाबा आजी सगळ्यांना मदत करायची ,सगळ्यांना हातभार लावायचा ,काय " कृष्णप्पा हो म्हणतो. दोघे परत खेळात बसतात. 

दुसरीकडे एक इसम गावाकडे सावकाराकडे  यज्ञ करायचा आहे असे गया वहिनींना सांगतो .गया वाहिनी सांगतात आचार्य बाहेर गेलेत ,येतीलच .तो इसम दत्त महाराजांचा भक्त असल्यामुळे गया वाहिनी त्यांना सांगते:"तुम्ही गुरु देव दत्त चे भक्त आहात का, अहो आमच्या गावात साक्षात दत्त रूप अवतारलेत स्वामींच्या रूपात ,तुम्ही दर्शन घ्या " तिथे आचार्य येतात :"तुम्ही लक्ष्य देऊ नका तिच्याकडे , चला व्यवहाराचं बगु " पण ती व्यक्ती आधी स्वामी दर्शन करू असे म्हणतो ,त्यामुळे आचार्य आणि ती व्यक्ती  स्वामी दर्शनाला जातात.      

No comments:

Post a Comment