जय जय श्री स्वामी समर्थ भाग 221 तिलोत्तमा ला हवीत स्वामींची नखं सदा सापडला अडचणींत "
कालिंदी चंदा ला ओरडते :"स्वतःच्या कामाशी काम ठेवायचं " हरी भाऊ कालिंदी ला विचारतात:"तू काय म्हणाली होतीस चांदुले शी चांगलं वागेन " कालिंदी चिडून आत मध्ये जाते.
दुसरीकडे तिलोत्तमा सदाला स्वामींची नखं आणायला सांगते आणि एक डब्बी देते .
दुसरीकडे स्वामी राधा अक्का ला नरसू च्या शेतातलय कालव्यातून शिंपला घेऊन यायला सांगतात . राधा अक्का :"कशाला हवा आहे शिंपला तुला ,वेडाचा कारभार नुसता " स्वामी :"हे बघ राधा अक्का ,गेलीस तर तुझाच फायदा आहे , नाही जायचा तर राहू दे" राधा अक्का तसाच आत मध्ये जाते . पण राधा अक्का फायदा होणार म्हणून परत शिंपले आणायला जाते . तिथं नारसप्पा येतात .स्वामी गोट्या खेळात असतात .स्वामी त्यांना गोट्या घेऊन यायला सांगतात . नारसप्पा हो म्हणून ते सगळे गोट्या गोळा करू लागतात . तिथे सदा येतो आणि सारखा समशरू करू का विचारतो . स्वामी नको नको म्हणतात पण नंतर हो म्हणतात . स्वामी गोट्या खेळात असतात , सदा स्वामींची दाडी करतो . आणि नंतर नख कापण्यासाठी थांबतो तो विचार करतो :" आज स्वामी नख कापायला हात का पूड करत नाहीत " स्वामी :"काय रे झाला ना समशरू करून ,आता काय गोट्या खेळायचं आहेत का " सदा परत सारखा नख कापण्यास सांगतो . स्वामी हात दाखवतात आणि सांगतात नखं वाढली नाहीत म्हणून . सदा मग तिथून जात असताना नरसाप्पाची शोदोरी ठेवतो .तेव्हा तिलोत्तमा नि दिलेला डब्बा खाली पडतो . स्वामी डब्बा घेऊन येतात .सदा घाबरतो . स्वामी :"तुझीच आहे ना " सदा :"होय होय " स्वामीं :"मग स्पष्टीकरण का देतोयस ,ह्याच्यात .... सोड जाऊदे जा चल " सदा काळजी करत तो डब्बा घेऊन जातो . स्वामी मागून फक्त हसतात .
No comments:
Post a Comment