राधा अक्का घरी येऊन ताईत चा प्रकरण सांगतात. दुसरीकडे बाळप्पा अंघोळ करून स्वामींना भेटायला निघतात ,पण आधी शंकराची पूजा करतात.स्वामी पण चोळप्पांच्या घरातून निघतात. बाळप्पा चोळप्पाच्या घरी येतात, चोळप्पा त्यांना गुलपाणी घ्याला सांगतात , पण बाळप्पा आधी स्वामींना भेटायला जातात आणि नंतर सविस्तर बोलू असे सांगतात.
दुसरीकडे स्वामी सुमुख ला खडसावतात "निर्मलाला त्रास देऊ नको , ती आमची लेक आहे". असा सांगून स्वामी पुढे जातात.सुमुख घाबरून आचार्यां :"निर्मला मला काय शोभायची ,तिला ना रंग ,ना रूप , हा बुवा सांगतो म्हणून नाही बारा का". सुमुख मग चंदाला वाड्यावर यायला सांगतो. पण चंदा मला बारा वाटत नाही म्हणून सांगते. कालिंदी चिडून तिला कामाला जायला सांगते. सुमुख सांगतो देवयानी बाईसाहेब आलेत. त्यावर वाड्यावर यायला चंदा लगेच तयार होते.
दुसरीकडे भुजंग आणि नरसप्पा काळजी करतात कि गाय चारा खात नाही.
स्वामी आल्यावर :"काय ग आमच्याकरता थांबून आहेस होय , आलो " असे म्हणून गाईला चारा खाऊ घालतात आणि सांगतात ,"आता रोज भुजंग अन नरसप्पा च्या हातानी चारा खायचा , रोज रोज तुला चारा खाऊ घालायला वेळ नाही ". असे सांगून स्वामी परत एका झाडा खाली येऊन थांबतात. बाळप्पा स्वामींना भेटायला आल्यावर, भुजंग सांगतात ,"आता इकडे गेलेत बघा " स्वामी बाळप्पाची परीक्षा घेत आहेत का?
No comments:
Post a Comment