--251
तारा अक्का सोमवती अमावास्याला खंडोबाला अभिषेख घालायचा आठवण करून देतात. सागेलेजन तयारीला लागतात . बाळप्पा स्वामींना मनातल्या मनात :"स्वामी माझ्या योग्य काही काम असेल तर सांगा " तिथे स्वामी येऊन :"अरे हा बाळप्पा ,आणेल कि पाणी ,त्याला सवय पण आहे अणे आवड पण आहे या सेवेची " बाळप्पा स्वामींना नमस्कार करतात. स्वामी सगळ्यांना गूळ वाटतात पण बाळप्पा राहून जातात. बाळप्पा दुखी होतात.
दुसरीकडे कृष्णप्पा स्वतःहून पाठांतर करत असतो. सगळेजण त्याचे कौतुक करतात आणि त्याला खंडोबाच्या अभिषेखला न्याचा ठरवतात आणि त्याला नवीन सदरा देतात.
दुसऱ्या दिवशीं सगळेजण तयारी करतात. राधा अक्का अभिषेख साठी दूध आणतात. चंदा आणि कृष्णप्पा दोन माळ तयार करतात एक खंडोबाला आणि एक स्वामींना. चंदा देवासाठी गाणं म्हणते. आचार्य चीड चीड करतात आणि स्वामींना "काय रे बुवा देवा कडे पाठ करून बसलास " स्वामी :"अरे रामाचार्य रोज धर्मकृत्य करतोस त्या नावाखाली लोकांना लुबाडतोस ,अरे तू किती पण देव भक्तीचा देखावा केलास ना तरी मनातला काळ कसा लपवणार " चोळप्पा पण विशोभा खेचर यांचा उद्धरण देतात कि ते कस शंकराच्या पिंडीवर पाय टाकून बसले होते."आचार्य स्वामींसारख्या सिद्ध पुरुषाला आपल्यासारख्या सामान्य माणसाचे नियम लागू होत नाही " बाळाप्पा पण पाणी घेऊन येतात. चोळप्पा :"अहो बाळप्पा एवढा ओझं एकट्यानं का आणलात मला सांगायचं " बाळप्पा :"अहो हे प्रेमाचा ओझं आहे व्यक्त केलं कि मन हलका होतं " कालिंदी चिडून :"ह्या बुवाला हात खाली राबायला माणसंच हवी असतात वर मोबदला पण देत नाही "
राधा अक्का :"कालिंदी तुझी जीभ अडकित्ता आहे हे सगळ्यांना माहित आहे, एक अनोळखी माणूस देवकार्यात आपल्याला मदत करतो , तुझं काय ग मध्ये मध्ये ,गप बस " आचार्य पूजेला बोलावतात. आचार्य खंडोबाला अभिषेख घालून पूजा करतात. सगळेजण :"खंडोबाच्या नावाने चांगभलं" सगळेजण हळद उधळून खंडोबाला नमस्कार करतात. बाळप्पा स्वामीना :"स्वामी ,असा वाटतंय ,सगळी नागरी जणू सोन्याची झाली" स्वामी :"सुवर्ण , आता ह्या नगरात सोन्याचाच बोलबाला होणार "
No comments:
Post a Comment